शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना केले निलंबित

By admin | Published: August 03, 2015 3:58 PM

काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.

ऑनलाइन लोकमत

वारंवार ताकीद देऊनही तसेच चर्चेसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणा-या तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे.

काम न केल्यास खासदारांचे भत्ते कापण्याचा कतित प्रस्ताव, सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी आदी विषयांवर काँग्रेसच्या खासदारांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रान उठवले आहे. जोपर्यंत आरोप ठेवलेल्या नेत्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर या विषयांवर चर्चा करण्यास आपण तयार असून या नेत्यांनी कुठलाही गुन्हा केला नसून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका भाजपाने घेतल्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्न अधिवेशन सुरू झाल्यापासून पडलेला आहे.

त्यात भर म्हणजे सभागृहामध्ये निषेधाचे फलक आणण्यास मनाई असताना काँग्रेसचे खासदार सातत्याने असे फलक दाखवत होते तसेच अध्यक्षांसमोरच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते. संख्याबळाच्या जोरावर भाजपा मुजोरीची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर चर्चा झाली तर काँग्रेसचे बिंग फुटेल म्हणून काँग्रेस चर्चाच होऊ देत नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

सोमवारी गेल्या आठवड्याप्रमाणेच संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळाचेच वातावरण राहीले आणि अखेर लोकसभेमध्ये अध्यक्षांनी काँग्रेसच्या १३ जणांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची अभूतपूर्व घटना घडली.