शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:07 IST

लोकसभेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर चर्चा

नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यानं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव दाखल करुन घेतला. आता शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होईल. मोदी सरकार पहिल्यांदाच अविश्वास ठरावाचा सामना करत असल्यानं शुक्रवारचा दिवस भाजपासाठी महत्त्वाचा आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करताच यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांना संख्याबळाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मात्र आकडेवारी लक्षात घेतल्यास लोकसभेत भाजपाची स्थिती अतिशय मजबूत आहे. लोकसभेत एकट्या भाजपाचे 273 खासदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे 18, लोकजनशक्ती पक्षाचे 6, शिरोमणी अकाली दलाचे 4 आणि अन्य पक्षांचे 9 खासदार भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकारचं संख्याबळ 310 वर जातं. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता, अविश्वास प्रस्तावाचा सामना करणं त्यांच्यासाठी फारसं आव्हानात्मक नाही. मात्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एकजूट होत असल्याचा संदेश देण्यासाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची ही एकजूट भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते. कैरानासह लोकसभेच्या अनेक पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाचा पराभव केला आहे. अविश्वास प्रस्तावामुळे सरकार कोसळणार नाही, याची कल्पना टीडीपी, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना आहे. मात्र तरीही विरोधकांची एकी दाखवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLoksabhaलोकसभाSonia Gandhiसोनिया गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन