शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 22:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर लोकसभेत मंगळवारपासून प्लॅस्टिकचे साहित्य वापरता येणार नसल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. 

तसेच लोकसभा सचिवालयाने प्लॅस्टिक बॉटल आणि अन्य प्लॅस्टिक साहित्याच्या वापरावर बंदी घालण्याबाबत अंमलबजावणी केली. संसदेतील सर्व विभाग आणि कर्मचा-यांना पर्यावरण पुरक साहित्य आणि पिशवी वापरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर पासून सर्व सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी सक्तीची असणार आहे. 

लोकसभा सचिवालयानं आज लोकसभेत नॉन-फंक्शनल प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास आजपासून बंदी घातली आहे. लोकसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना आणि संसद भवन संकुलात कार्यरत असलेल्या इतर सहाय्यक एजन्सींना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच प्लॅस्टिक वस्तूऐवजी पर्यावरणास अनुकूल आणि नैसर्गिक कचर्‍याच्या पिशव्या वापरण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करतांना 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील जनतेला प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास सांगितले. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा