शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 10:15 IST

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील 91 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही मतदानप्रकिया पार पडली. मात्र, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तर, जम्मू आणि काश्मीरच्या पुँछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्यानंतर, आता उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याबाबत समजताच सपा-बसपा आघाडीचे उमेदवारही घटनास्थळी पोहोचले होते. कसौली येथील बुथ क्रमांक 16 येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतरही चौथे आणि पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.  

मतदारांनी आरोप केला आहे की, 5 ते 7 मतदार मतदानासाठी गेले होते. मात्र, हत्तीसमोरील बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी बुथवरील निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रारही करण्यात आली. तसेच तेथील उमेदवार मलूक नागर यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. 'मला मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे मत भाजपाला मिळत आहे, काहीवेळा सलगही मतदान केल्यास व्हीव्हीपॅट मशिनमधून कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती, असे बसपचे उमेदवार मलूक नागर यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी बिजनोर क्षेत्राचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी राकेश कुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे. देशात शांततेत मतदान सुरू आहे. मॉक व्होटींगवेळी अशा काही समस्या जाणवल्या होत्या. त्यामुळे, तात्काळ मशिनचा सेटअप बदलण्यात आल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :VotingमतदानVVPATव्हीव्हीपीएटीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९