शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 10:15 IST

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील 91 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही मतदानप्रकिया पार पडली. मात्र, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तर, जम्मू आणि काश्मीरच्या पुँछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्यानंतर, आता उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याबाबत समजताच सपा-बसपा आघाडीचे उमेदवारही घटनास्थळी पोहोचले होते. कसौली येथील बुथ क्रमांक 16 येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतरही चौथे आणि पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.  

मतदारांनी आरोप केला आहे की, 5 ते 7 मतदार मतदानासाठी गेले होते. मात्र, हत्तीसमोरील बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी बुथवरील निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रारही करण्यात आली. तसेच तेथील उमेदवार मलूक नागर यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. 'मला मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे मत भाजपाला मिळत आहे, काहीवेळा सलगही मतदान केल्यास व्हीव्हीपॅट मशिनमधून कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती, असे बसपचे उमेदवार मलूक नागर यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी बिजनोर क्षेत्राचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी राकेश कुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे. देशात शांततेत मतदान सुरू आहे. मॉक व्होटींगवेळी अशा काही समस्या जाणवल्या होत्या. त्यामुळे, तात्काळ मशिनचा सेटअप बदलण्यात आल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :VotingमतदानVVPATव्हीव्हीपीएटीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९