शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

"डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका"; CM ममता बॅनर्जींनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:07 IST

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील युवा वर्गांना उद्देशून भाषण केले.

कोलकाता - आगामी २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपाकडून पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असून केंद्रीयमंत्र्यांना अनेक राज्यात पाठवण्यात येत आहे. तसेच, भाजपाशासित राज्यातील सरकारद्वारे जनतेला मोदी सरकारच्या कामाची आणि राज्य सरकारच्या योजनांचा माहिती देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली असून भाजपचा पराभव हेच लक्ष्य असल्याचे सर्वांनी म्हटलं आहे. याच इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील युवा वर्गांना उद्देशून भाषण केले. यावेळी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष डिसेंबर महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका घेऊ शकते. कारण, भाजपाने निवडणुकांच्या प्रचारासाठी अगोदर हेलिकॉप्टर बुक केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपावर निशाणा साधला. जर भाजपाला देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर मनमानी कारभाराचे सरकार, निरंकुश सरकार देशवासीयांना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

भाजपा डिसेंबर २०२३ मध्येच निवडणुका घेऊ शकते. भाजपाने निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर बुक करुन ठेवले आहेत. इतर राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर प्रचारासाठी वापरता येऊ नयेत, म्हणून भाजपने ही खेळी खेळल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला. दरम्यान, एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षही एकवटला असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतर्फे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात एनडीएनेही ३८ पक्षांना एकत्र घेऊन आघाडी केली आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा