शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

"डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका"; CM ममता बॅनर्जींनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:07 IST

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील युवा वर्गांना उद्देशून भाषण केले.

कोलकाता - आगामी २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपाकडून पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असून केंद्रीयमंत्र्यांना अनेक राज्यात पाठवण्यात येत आहे. तसेच, भाजपाशासित राज्यातील सरकारद्वारे जनतेला मोदी सरकारच्या कामाची आणि राज्य सरकारच्या योजनांचा माहिती देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली असून भाजपचा पराभव हेच लक्ष्य असल्याचे सर्वांनी म्हटलं आहे. याच इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील युवा वर्गांना उद्देशून भाषण केले. यावेळी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष डिसेंबर महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका घेऊ शकते. कारण, भाजपाने निवडणुकांच्या प्रचारासाठी अगोदर हेलिकॉप्टर बुक केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपावर निशाणा साधला. जर भाजपाला देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर मनमानी कारभाराचे सरकार, निरंकुश सरकार देशवासीयांना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

भाजपा डिसेंबर २०२३ मध्येच निवडणुका घेऊ शकते. भाजपाने निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर बुक करुन ठेवले आहेत. इतर राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर प्रचारासाठी वापरता येऊ नयेत, म्हणून भाजपने ही खेळी खेळल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला. दरम्यान, एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षही एकवटला असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतर्फे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात एनडीएनेही ३८ पक्षांना एकत्र घेऊन आघाडी केली आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा