शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:56 IST

सर्वच राजकीय पक्षांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड वसूल केली जाते.

देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच देशात आचारसंहिता लागू होते. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड वसूल केली जाते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, बेकायदेशीरपणे किंवा निवडणुकीदरम्यान नियमांविरुद्ध वापरलेली रोकड आणि दारू पोलिसांकडून जप्त केली जाते. निवडणुकीच्या काळात या कोट्यवधी रुपयांचे आणि जप्त केलेल्या दारूचं काय होतं आणि कुठे जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत जाणून घेऊया....

काळ्या पैशाचा सर्वाधिक वापर निवडणुकांमध्ये होतो. बहुतेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त खर्च करतात. निवडणुकीच्या कामात काळा पैसा वापरला जातो ज्याचा कोणताही हिशोब दिला जात नाही. त्यामुळे विविध ठिकाणांहून पक्ष आणि उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रोकड पोहोचवली जाते. यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. ते संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची आणि लोकांची तपासणी आणि चौकशी करत असतात. याशिवाय पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून किंवा माहिती देणाऱ्यांकडूनही माहिती मिळते. मग ते छापा टाकून रोकड किंवा दारू जप्त करतात.

निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून जी काही रोकड जप्त केली जाते ती आयकर विभागाकडे सोपवली जाते. पोलीस ज्या व्यक्तीकडून रोख रक्कम गोळा करतात ती नंतर त्यावर दावा करू शकते. हा पैसा स्वतःचा आहे आणि तो बेकायदेशीरपणे कमावला गेला नाही हे सिद्ध करण्यात ती व्यक्ती यशस्वी झाली आणि जर त्याने पुरावा म्हणून संपूर्ण माहिती सादर केली तर त्याला पैसे परत केले जातात. पुराव्यासाठी, तुमच्याकडे एटीएम व्यवहार, बँकेची पावती आणि पासबुकमधील नोंद असणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या रकमेवर कोणी दावा केला नाही तर तो पैसा सरकारी तिजोरीत जमा होतो.

निवडणुकीच्या काळात रोख रकमेशिवाय मोठ्या प्रमाणात दारूही जप्त केली जाते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केला जातो. या दारूची कायदेशीर वाहतूक होत असेल तर कारवाई केली जात नाही. मात्र कागदपत्रांशिवाय वाहतूक केल्यास ती दारू जप्त केली जाते. निवडणुकीदरम्यान सापडलेली सर्व दारू प्रथम एकाच ठिकाणी जमा केली जाते. नंतर ती एकत्रच नष्ट केली जाते. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MONEYपैसा