शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 11:07 IST

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Priyanka Gandhi : राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर आहे. 

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात केरळमधील वायनाडमध्येही मतदान होणार आहे. या जागेवरून राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर आहे. 

या दोन्ही जागांसाठी 26 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या जागांवर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रियंका आणि राहुल अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.

या दोन्ही जागांवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या दोन्ही जागांची औपचारिक घोषणा 30 एप्रिलपूर्वी होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दोन जागांवर राहुल आणि प्रियंका यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत काँग्रेस नेत्यांनीही काहीही सांगितलेले नाही.

अमेठी आणि रायबरेलीला जाण्यापूर्वी राहुल आणि प्रियंका अयोध्येला जाऊ शकतात, तिथे त्यांना रामललाचे दर्शन घेता येईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने संकेत दिले आहेत की, जर राहुल आणि प्रियंका यांनी या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर 1 आणि 3 मे रोजी या जागांवर उमेदवारी अर्ज भरता येतील. 

अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी यांच्या टीमने अमेठीत तळ ठोकला आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारीसाठी यूपी काँग्रेस संघाला एक मे ही संभाव्य तारीख देण्यात आली आहे. काँग्रेस एक मे रोजी अमेठीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी 27 एप्रिलला अमेठीला पोहोचण्याची शक्यता आहे. अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक जागा आहेत. राहुल गांधी दोन वेळा अमेठीतून लोकसभेचे खासदार राहिले आहेत, तर सोनिया गांधी या रायबरेलीतून सातत्याने विजयी होत आहेत.

2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत. 

2019 मध्ये सोनिया गांधी यांनी ही आपली शेवटची लोकसभा निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी रायबरेलीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. सोनिया गांधी एकूण पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. सोनियांनी रायबरेलीसोबतचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या खूपच भावूक झाल्या होत्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी