शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 19:36 IST

"आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत, हे निश्चित झाले आहे."

Rahul Gandhi Rally : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते जोमाने प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या अराह येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर काय केले जाईल, याबाबत माहिती दिली. 

राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

गरीब महिलांच्या खात्यावर 85000 रुपये टाकणारते म्हणाले की, "इंडिया आघाडीसमोर दोन समस्या आहेत. एक म्हणजे गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी आणि दुसरी म्हणजे बेरोजगारी. काँग्रेस या दोन्ही समस्या एकाच वेळी सोडवणार आहे. 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि त्यानंतर देशातील गरीबांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल अन् अशा देशातील करोडो गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा 8500 रुपये टाकतेल जातील. याची सुरुवात येत्या 5 जुलैपासून केली जाईल."

"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा

इंडिया आघाडी सत्तेवर येताच...या सभेपूर्वी त्यांनी भोजपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, "आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, हे निश्चित आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. भाजप जिंकला तर संविधान बदलून टाकेल. मी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले- भारतात फक्त दोनच जाती आहेत. श्रीमंत आणि गरीब. देशात फक्त 2 जाती आहेत तर नरेंद्र मोदी ओबीसी कसे झाले? म्हणून आम्ही ठरवलंय...इंडिया आघाडी सत्तेवर येताच आम्ही देशात जात जनगणना करू. नरेंद्र मोदींची अग्निवीर योजना देशाच्या लष्कर आणि तरुणांच्या देशभक्तीचा अपमान आहे. आमचे सरकार स्थापन होताच आम्ही सर्वप्रथम अग्निवीर योजना रद्द करू."

पीएम नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष...

प्रियंका गांधींचा घणाघातकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीदेखील भाजपवर जोरदार टीका केली. "भाजप आपल्या पैशाच्या जोरावर राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, पण सरकार चोरण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवणारे तेच आहेत. काँग्रेसने नेहमीच देशाची सेवा केली, आमच्यासाठी जनता सर्वोपरि आहे. आम्ही, आमचे सरकार, आमचे नेते आणि आमची विचारधारा ओळखा. आपल्या मताचा वापर लोकशाही आणि संविधानासाठी केला पाहिजे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी