शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:49 IST

PM Modi Election Rally: 'काँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती.'

PM Modi Targeted Congress: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. यासाठी सर्वच पक्षातील नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याच क्रमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (02 मे) गुजरातच्या जुनागडमध्ये झालेल्या सभेतून काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, त्यांचा उद्देश प्रभू रामाचा पराभव करणे आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक भगवान श्रीरामाविरोधात लढण्याची निवडणूक बनली आहे. भगवान श्रीरामाचा पराभव करुन कोण जिंकेल? याच विचाराने मुघलांनी आमचे राम मंदिर, सोमनाथाचे मंदिर पाडले. काँग्रेससाठी ही निवडणूक आपले अस्तित्वाची निवडणूक बनली आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.

पीएम मोदींचे काँग्रेसला आव्हानसीएएच्या मुद्द्यावर बोलताना पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे. आपल्या शेजारील देशात राहणारे लोक, ज्यांचा दोष फक्त एवढाच आहे की, ते हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी धर्माचे पालन करतात. त्यांचा तिथे अनन्वित छळ केला जातो. त्या छळाला कंटाळून ते भारतात आले. मी त्यांच्यासाठी नागरिकत्व कायदा बनवला, पण काँग्रेसवाले म्हणतात की, आम्ही तो कायदा रद्द करणार. मी काँग्रेसला आव्हान देतो, तुम्ही ना कलम 370 परत आणू शकता, ना CAA रद्द करू शकता...

कलम 370 जमिनीत गाडलेकलम 370 बाबत ते म्हणाले, सरदार पटेल नसते तर आज जुनागडही पाकिस्तानात गेले असते. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. ही निवडणूक मोदीच्या मिशनसाठी आहे. माझे ध्येय देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, देशाला पुढे नेण्यासाठी आहे. काँग्रेसचा अजेंडा काय तर, काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे. पंचायतीपासून संसदेपर्यंत ज्यांचे सरकार होते, पण त्यांना देशाची राज्यघटना संपूर्ण देशात लागू करता आली नाही. भारतात एक राज्यघटना होती अन् जम्मू-काश्मीरमध्ये वेगळीच राज्यघटना होती. सरदार पटेल असते तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना अभिमानाने लागू झाली असती. पण, आज आम्ही कलम 370 जमिनीत गाडले. हा मोदी आहे, तुम्ही स्पर्धा करू शकणार नाही, असे आव्हान त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

‘मोहब्बत की दुकान'मध्ये खोटं कामकाँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेसने श्रीलंकेला कचठेवू बेट दिले. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती. ते हिमालयाचा सौदा करायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. गुजरातच्या किनारी भागात अनेक बेटे आहेत, जिथे कोणीही राहत नाही. काँग्रेस अशा बेटांचाही सौदा करू शकते. गुजरातबाबत काँग्रेसच्या मनात जो राग आणि द्वेष आहे, काँग्रेस सत्तेत आल्यास देशासाठी आणि गुजरातसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते भाजप नेत्यांचे फेक व्हिडिओ बनवतात. प्रेमाच्या दुकानात उघडपणे खोटं काम करतात, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस