शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
6
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
7
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
8
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
9
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
10
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
11
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
12
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
13
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
14
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
15
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
16
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
17
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
18
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
19
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
20
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले

"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 09:12 IST

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. कानपूर लोकसभा जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र या जागेवर भाजपामधील लढत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपाने कानपूरच्या जागेवर रमेश अवस्थी हा नवा चेहरा दिला आहे, मात्र या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत कानपूरमधील भाजपाचे माजी उपाध्यक्ष, वीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, ज्येष्ठ नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कानपूरमधील उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 400 पारचा संकल्प पूर्ण करणं अवघड आहे.

कोण आहेत प्रकाश शर्मा?

कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रकाश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपा, वीएचपी, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. शहराच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही त्यांचा सहभाग आहे, मात्र कानपूर मतदारसंघासाठी उमेदवार रमेश अवस्थी यांच्या निवडीबाबत आणि निवडणूक लढवल्यावर होणाऱ्या नुकसानाबाबत भाजपाने पंतप्रधानांना पत्र लिहिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. 

पंतप्रधानांना लिहिलेलं हे पत्र व्हायरल झालं असून, त्यात कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी असल्याचं म्हटलं आहे. "या भूमीतून जनसंघ आणि भाजपासाठी मैदान तयार करण्यात आलं आहे. येथे पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपाचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी काय योगदान दिले, याची माहितीही येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना नाही."

"कानपूरची भूमी कार्यकर्ता विरहित झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत धुमाकूळ घालत आहेत. असेच चालू राहिले तर पंतप्रधानजी, तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील" असं पत्रात म्हटलं आहे. कानपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रमेश अवस्थी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत. पण, त्याआधीच या पत्रावरून वाद सुरू झाला असून भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण