शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:27 IST

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारत सरकार चालू आर्थिक वर्षात 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे. पण का?"

"स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या 67 वर्षांत देशावर एकूण 55 लाख रुपये कर्ज होते. गेल्या 10 वर्षात एकट्या मोदीजींनी ते 205 लाख कोटी रुपये केले. गेल्या 10 वर्षांत सुमारे 150 लाख कोटी रुपयांचे कर्ज या लोकांनी घेतलं आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकावर सरासरी कर्ज सुमारे दीड लाख रुपये आहे. हा पैसा राष्ट्रनिर्माणाच्या कोणत्या कामासाठी वापरला जात आहे?"

"नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या की प्रत्यक्षात नोकऱ्या गायब झाल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शाळा आणि रुग्णालयांचं काय झालं? सार्वजनिक क्षेत्र मजबूत झाले की कमकुवत झाले? मोठे- मोठे कारखाने आणि उद्योग उभारले गेले का?"

"जर असे झाले नाही, जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांची दुरवस्था झाली असेल, जर श्रमशक्ती कमी झाली असेल, जर छोटे आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले असतील - तर हा पैसा गेला कुठे? कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च झाला? मोठ्या अब्जाधीशांच्या कर्जमाफीवर किती पैसे खर्च झाले?"

"आता सरकार नवे कर्ज घेण्याची तयारी करत असताना, गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटाचा ओझं वाढत असताना, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४