शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मोदींनी 2004 चा इतिहास विसरु नये- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 17:21 IST

2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं

रायबरेली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2004 चा इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयीही अजिंक्य होते मात्र त्यावेळी आम्हीच जिंकलो होतो. 2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधी यांनी हे भाष्य केलं. सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान देण्यात आलं. भारताच्या इतिहासात असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, ते अजिंक्य आहेत त्यांना कोणीही हरवू शकत नाही मात्र या देशातील जनता त्यांच्यापेक्षा मोठी आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षात देशातील जनतेसाठी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त अनिल अंबानी यांना राफेल कंत्राट कसं मिळालं? याचं उत्तर द्यावं असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. 

 

सोनिया गांधी यांनी आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी रोड शो काढला तसेच पूजा हवनदेखील करण्यात आला. सोनिया गांधी याआधी 4 वेळा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा व नातवंडेही रेहान आणि मिराया यावेळी त्यांच्यासोबत होती. रायबरेली हा मतदारंसघ गांधी कुटुंबासाठी गड मानला जातो. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळख होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजपानेही रणनिती आखली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विजय कोणाचा होईल हे देशातील जनताच ठरवू शकणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी