शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आपसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 13:04 IST

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असताना दिल्लीत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीवरुन अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. आपशी आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असताना दिल्लीत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीवरुन अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. आपशी आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. आपशी आघाडी करावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसमधील गटाला विरोध करण्याचं काम विरोधी गट करत आहे. त्यामुळे आपबाबतच्या आघाडीवरुन काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं समोर येतंय. 

सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये आपसोबत आघाडी करण्यावरुन पक्षातील नेत्यांची राहुल गांधी यांनी मते जाणून घेतली. दिल्ली काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष शिला दिक्षित यांनी आपसोबत आघाडी करण्याला विरोध केला तर माजी अध्यक्ष अजय माकन यांनी आपसोबत आघाडी करावी अशी इच्छा व्यक्त केली. 

आपसोबत आघाडी करण्यासाठी दिल्लीतील काँग्रेस प्रभारी पीसी चाको, सहप्रभारी कुलजीत नागरा, माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन, अरविंदर सिंह, सुभाष चोपडा, ताजबर बाबर हे काँग्रेस नेते आपशी आघाडी करण्यास इच्छुक आहेत तसेच यांच्यासोबत दिल्लीतील 14 जिल्हाध्यक्षही आपबरोबर आघाडी व्हावी म्हणून या नेत्यांच्या पाठिशी आहेत. 

तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित, कार्यकारी अध्यक्ष हारुन युसुफ, राजेश लिलोठिया, देवेंद्र यादव, जे पी अग्रवाल, योगानंद शास्त्री या काँग्रेस नेत्यांनी आपसोबत आघाडी करण्याला विरोध केला आहे. दिल्लीतील या घडामोडींबर राहुल गांधी यांनी दोन्ही बाजूच्या गटाने पत्र पाठवून आपलं म्हणणं मांडलं आहे. यावर राहुल गांधी संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. 

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने आघाडी करावी असं मत अनेकवेळा मांडले आहे मात्र काँग्रेसकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नसल्याने आपने सहा उमेदवारांची घोषणाही केली आहे. आपसोबत आघाडी करणार नाही असं मागील काँग्रेस बैठकीत स्पष्ट झालं होतं त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपात छुपी युती असून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी काँग्रेस मदत करत आहे असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मात्र काँग्रेस-आपमधील या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षांशी बातचीत केली यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाशी आघाडी होण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल