शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भाजप सोडताना अडवणींच्या डोळ्यात आश्रू; पण त्यांनी रोखले नाही : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 11:35 IST

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष सोडण्याचा आपला निर्णय जेंव्हा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना समजला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते, अशी माहिती भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नवीन इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम मी अडवाणी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते. परंतु, त्यांनी मला रोखले नाही. ठिक आहे, आपला स्नेह कायम राहिल असंही अडवाणींनी म्हटल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. तसेच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक मिळत नाही. अडवणी भाजपच्या संस्थापकांपैकी एक आहेत. मात्र भाजपने त्यांनाच तिकीट नाकरले. पक्षाने गांधीनगर येथून पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअर स्ट्राईकमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का, या संदर्भात सिन्हा यांना विचारण्यात आले. त्यावर सिन्हा म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बेरोजगारीचा मुद्दा काढल्यास ते पुलवामाची आठवण करून देतात. जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे २३ मे नंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी मोदींनी 'एक्सपायरी पीएम' म्हटले आहे. ही उपाधी त्यांच्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांना आपली झोळी उचलून निघावे लागणार, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी