शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:18 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, ४ जून रोजी निकास समोर येणार आहेत. याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे करण्यास सुरूवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निकालांवर भाकीत केले आहे. "भाजप ३७० चा आकडा गाठत नाहीये. मात्र, भाजप २७० च्या खाली जात नसल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले. 

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले आहे. "२०१९ च्या तुलनेत यावेळी भाजप चांगली कामगिरी करेल. गेल्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. भाजप यावेळी यापेक्षा चांगली कामगिरी करणार आहे. गेल्या वेळी भाजपने जिंकलेल्या ३०३ जागांपैकी भाजप कुठून जिंकला हे पाहावे लागेल. या ३०३ जागांपैकी भाजपने उत्तर-पश्चिममध्ये २५० जागा जिंकल्या. यावेळी भाजपचे या भागात नुकसान होते का, हे पाहावे लागेल, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

प्रशांत किशोर म्हणाले, दुसरे क्षेत्र पूर्व आणि दक्षिण आहे. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश. या भागात भाजपकडे सध्या ५० जागा आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्ही राज्यांमध्ये वाढत आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाजपच्या जागा १५-२० ने वाढत आहेत. 

"योगेंद्र यादव २७२ जागा येत नसल्याचे सांगत आहेत. ते जवळपास २६८ जागांचा विचार करत आहेत. मात्र असे असतानाही भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान होत असल्याचा लोकांचा विश्वास आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

'४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल'

महाराष्ट्रात विरोधकांनी जास्तीत जास्त २०-२५ जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या २३ जागा आहेत, म्हणजेच जागांची संख्या अजूनही कमी होत नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. "काही लोक यूपीमध्ये संख्या कमी होत असल्याचे सांगत आहेत. पण हे विसरत आहेत की, २०१४ च्या तुलनेत गेल्या वेळी भाजपला बिहार आणि यूपीमधून जवळपास २५ जागा गमवाव्या लागल्या होत्या. कारण सपा-बसपाने एकत्र निवडणूक लढवली होती. यूपीमध्ये भाजपच्या २० जागा कमी होत आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर मी म्हणेन भाजपचे कुठे नुकसान झाले? त्यांनी आधीच १८ जागा गमावल्या आहेत. भाजपने ४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल. पण हे ना विरोधी पक्ष सांगत आहे ना पक्ष, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी