शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:18 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, ४ जून रोजी निकास समोर येणार आहेत. याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे करण्यास सुरूवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निकालांवर भाकीत केले आहे. "भाजप ३७० चा आकडा गाठत नाहीये. मात्र, भाजप २७० च्या खाली जात नसल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले. 

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले आहे. "२०१९ च्या तुलनेत यावेळी भाजप चांगली कामगिरी करेल. गेल्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. भाजप यावेळी यापेक्षा चांगली कामगिरी करणार आहे. गेल्या वेळी भाजपने जिंकलेल्या ३०३ जागांपैकी भाजप कुठून जिंकला हे पाहावे लागेल. या ३०३ जागांपैकी भाजपने उत्तर-पश्चिममध्ये २५० जागा जिंकल्या. यावेळी भाजपचे या भागात नुकसान होते का, हे पाहावे लागेल, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

प्रशांत किशोर म्हणाले, दुसरे क्षेत्र पूर्व आणि दक्षिण आहे. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश. या भागात भाजपकडे सध्या ५० जागा आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्ही राज्यांमध्ये वाढत आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाजपच्या जागा १५-२० ने वाढत आहेत. 

"योगेंद्र यादव २७२ जागा येत नसल्याचे सांगत आहेत. ते जवळपास २६८ जागांचा विचार करत आहेत. मात्र असे असतानाही भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान होत असल्याचा लोकांचा विश्वास आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

'४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल'

महाराष्ट्रात विरोधकांनी जास्तीत जास्त २०-२५ जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या २३ जागा आहेत, म्हणजेच जागांची संख्या अजूनही कमी होत नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. "काही लोक यूपीमध्ये संख्या कमी होत असल्याचे सांगत आहेत. पण हे विसरत आहेत की, २०१४ च्या तुलनेत गेल्या वेळी भाजपला बिहार आणि यूपीमधून जवळपास २५ जागा गमवाव्या लागल्या होत्या. कारण सपा-बसपाने एकत्र निवडणूक लढवली होती. यूपीमध्ये भाजपच्या २० जागा कमी होत आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर मी म्हणेन भाजपचे कुठे नुकसान झाले? त्यांनी आधीच १८ जागा गमावल्या आहेत. भाजपने ४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल. पण हे ना विरोधी पक्ष सांगत आहे ना पक्ष, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी