शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 12:18 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, ४ जून रोजी निकास समोर येणार आहेत. याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे करण्यास सुरूवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निकालांवर भाकीत केले आहे. "भाजप ३७० चा आकडा गाठत नाहीये. मात्र, भाजप २७० च्या खाली जात नसल्याचेही प्रशांत किशोर म्हणाले. 

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले आहे. "२०१९ च्या तुलनेत यावेळी भाजप चांगली कामगिरी करेल. गेल्या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. भाजप यावेळी यापेक्षा चांगली कामगिरी करणार आहे. गेल्या वेळी भाजपने जिंकलेल्या ३०३ जागांपैकी भाजप कुठून जिंकला हे पाहावे लागेल. या ३०३ जागांपैकी भाजपने उत्तर-पश्चिममध्ये २५० जागा जिंकल्या. यावेळी भाजपचे या भागात नुकसान होते का, हे पाहावे लागेल, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

प्रशांत किशोर म्हणाले, दुसरे क्षेत्र पूर्व आणि दक्षिण आहे. बिहार, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश. या भागात भाजपकडे सध्या ५० जागा आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्ही राज्यांमध्ये वाढत आहेत. बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाजपच्या जागा १५-२० ने वाढत आहेत. 

"योगेंद्र यादव २७२ जागा येत नसल्याचे सांगत आहेत. ते जवळपास २६८ जागांचा विचार करत आहेत. मात्र असे असतानाही भाजप पुन्हा सत्तेत येत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान होत असल्याचा लोकांचा विश्वास आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

'४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल'

महाराष्ट्रात विरोधकांनी जास्तीत जास्त २०-२५ जागा जिंकल्या तरी सध्या महाराष्ट्रात भाजपच्या २३ जागा आहेत, म्हणजेच जागांची संख्या अजूनही कमी होत नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. "काही लोक यूपीमध्ये संख्या कमी होत असल्याचे सांगत आहेत. पण हे विसरत आहेत की, २०१४ च्या तुलनेत गेल्या वेळी भाजपला बिहार आणि यूपीमधून जवळपास २५ जागा गमवाव्या लागल्या होत्या. कारण सपा-बसपाने एकत्र निवडणूक लढवली होती. यूपीमध्ये भाजपच्या २० जागा कमी होत आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर मी म्हणेन भाजपचे कुठे नुकसान झाले? त्यांनी आधीच १८ जागा गमावल्या आहेत. भाजपने ४० ते ५० जागा गमावल्या तरच भाजपचे नुकसान होईल. पण हे ना विरोधी पक्ष सांगत आहे ना पक्ष, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी