शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 17:57 IST

Lok Sabha Election 2024: तुरुंगातून बाहेर आल्यापासून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर घणाघाती आरोप करत आहेत. हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन आणि एका मेट्रो ट्रेनमध्ये अरविंद केजरीवाल यांना मारण्याची धमकी देणारे संदेश लिहिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीतील कथित मद्यघोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. त्यामुळे आप आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने सामने आले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर आले आहेत. दिल्लीत २५ मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी केजरीवाल यांची सुटका झाल्याने आम आदमी पक्षाला बळ मिळाले आहे. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती आरोप करत आहेत. हे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन आणि एका मेट्रो ट्रेनमध्ये अरविंद केजरीवाल यांना मारण्याची धमकी देणारे संदेश लिहिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे संदेश असलेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद उल्लेख करण्यात आलेला आहे. आता हे संदेश म्हणजे भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट असल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

आता हे संदेश लिहिलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने दिल्ली निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा कथित कट हा पंतप्रधान कार्यालयामधून रचली गेली होती, असा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजपा घाबरली आहे. भाजपा आता अरविंद केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचत आहे. हा कट थेट पंतप्रधान कार्यालयामधूम संचालित होत आहे, असा सनसनाटी दावाही आपने केला आहे.

संजय सिंह म्हणाले की, राजीव चौक आणि पटेलनगर मेट्रो स्टेशनवर केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश लिहिण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवामुळे सैरभैर झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी स्वाती मालिवाल यांचा वापर केला. आता अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे, असा आरोप त्यांनी केला.

एका व्यक्तीने राजीव चौक, पटेल चौक आणि पटेल नगर या तीन मेट्रो स्टेशनवरील भिंतींवर धमकी देणारे संदेश लिहिले आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल सोशल मीडियावर व्हायरल केले. या स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात. मग त्या व्यक्तीवर कारवाई का केली गेली नाही. सायबर सेल कुठे आहे? यावरून हा भाजपाचा डाव असल्याचे सिद्ध होतंय, असा आरोप आतिशी यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४