शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:15 IST

'2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती, हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे.'

Narendra Modi Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यात मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज त्यांनी बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, 'ते म्हणतात की मोदींनी गॅरंटी देणे योग्य नाही, त्यावर बंदी घातली पाहिजे. मोदींनी दिलेली गॅरंटी बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझी नियत साफ आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझ्यात ती पूर्ण करण्याची ताकद आहे, असं मोदी म्हणाले.

विरोधकांच्या मनात श्रीरामाविषयी वैरजानेवारी महिन्यात अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचा भव्य सोहळा झाला, त्या सोहळ्याकडे बहुतांश विरोधी पक्षांनी पाठ फिरवली होती. अशा नेत्यांवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल, अशी गॅरंटी मी दिली होती, आज मंदिर बांधून तयार आहे. राम मंदिराचे काम थांबवण्यासाठी काँग्रेस आणि राजदने वर्षानुवर्षे प्रयत्न केले, पण अखेर ते पूर्ण झाले.  विरोधकांच्या मनात भगवान राम, अयोध्येशी काय वैर आहे की, त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला एवढा विरोध केला. त्यांच्या मनात इतके विष भरले आहे की, त्यांच्या पक्षातील काही लोक सोहळ्यात सामील झाले म्हणून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

रामनवमी येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका...रामनवमी येत आहे, ही पापे करणाऱ्यांना विसरू नका. त्यांनाही माहितेय की, मोदींच्या गॅरंटीमुळे त्यांची दुकान बंद होत आहे, म्हणूनच हे लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत. इंडिया आघाडीकडे ना दूरदृष्टी आहे, ना विश्वासार्हता आहे. ते दिल्लीत एकत्र येतात आणि आपापल्या राज्यात एकमेकांना शिव्या देतात. ते बळजबरीने एकत्र आले आहेत. INDIA आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तींचे घर आहे. या आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच ते पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात, अशी घणाघाती टीका मोदींनी यावेळी केली.

मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाहीगेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मोदीचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही, तर कष्ट करण्यासाठी झाला आहे. मी देशातून गरिबी हटवण्याच्या मिशनमध्ये गुंतलो आहे. तुमच्याप्रमाणे मीही गरिबीत पुढे आलोय. 2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, गरिबांना मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे. गेल्या दहा वर्षांत सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी जे काम केले, ते स्वातंत्र्याच्या सहा दशकातही झाले नाही. जोपर्यंत गरिबी हटवत नाही, तोपर्यंत मला शांत झोप येणार नाही. ता देशातील माझ्या कुटुंबीयांनी तिसऱ्यांदा मजबूत सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४