शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
4
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
5
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
6
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
7
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
8
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
9
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
10
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
11
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
13
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
14
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
15
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
17
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
18
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
19
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
20
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:04 IST

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, निवडणुकीत जिंकलो तर संविधान बदलू, त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला होता. भाजपा-एनडीएला 150 जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.

ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं राहुल म्हणाले. "एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे, जी संविधान वाचवण्यात मग्न आहे. भाजपाच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील 50 टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत" असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. 

राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकांना सांगितलं की, "पंतप्रधान मोदींना हे (संविधान) काढून टाकायचं आहे आणि त्यांना फक्त राज्य करायचं आहे. त्यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आहेत. हे त्यांचे ध्येय आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांना जे काही अधिकार मिळाले ते याचे (संविधान) योगदान आहे."

"भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, सत्तेत आल्यास ते हे बाजूला ठेवतील. त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला आहे. त्यांना 150 जागाही मिळणार नाहीत. त्यांचे नेते सांगत आहेत. ते आरक्षण काढून घेतील, आम्ही दलित, मागासवर्गीय आणि गरिबांना जितकं आरक्षण हवंय ते देऊ" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा