शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann : "अरविंद केजरीवालांना जेलमध्ये..."; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:48 IST

Bhagwant Mann And Arvind Kejriwal : भाजपाच्या 400 पार करण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, भारतातील 140 कोटी जनता ठरवेल की कोणाला किती जागा मिळतील. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही.

गुजरातमध्ये जनतेला संबोधित करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपाच्या 'अबकी बार 400 पार' या घोषणेला घोटाळा म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवणं हा सत्ताधारी पक्षाचा कट आहे असंही म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाजपाची ही रणनीती असल्याचा दावा भगवंत मान यांनी केला आहे

भाजपाच्या 400 पार करण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री मान म्हणाले की, भारतातील 140 कोटी जनता ठरवेल की कोणाला किती जागा मिळतील. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही. भरूच शहरात आम आदमी पार्टीचे उमेदवार चैत्रा वसावा यांच्या समर्थनार्थ रोड शो आयोजित केल्यानंतर सीएम मान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याबाबत ते म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी मतदारांना गॅरंटी देण्याचा ट्रेंड केजरीवाल यांनीच सुरू केला. फक्त केजरीवाल गॅरंटी द्यायचे. आता भीतीपोटी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात गॅरंटीची चर्चा सुरू केली आहे."

"'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीच शाळा, रुग्णालये आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. अरविंद केजरीवाल यांनीच शाळा, रुग्णालये, पायाभूत सुविधा आणि वीज यावर बोलायला शिकवलं आहे." भाजपावर हल्लाबोल करताना पंजाबचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ते फक्त द्वेष पसरवतात. जातीपातीच्या राजकारणाच्या चिखलात ते अडकलेले असताना आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत.

आदिवासीबहुल भरुच लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे आमदार आणि युवा आदिवासी नेते चैत्रा वसावा हे भाजपाचे सहा वेळा खासदार मनसुख वसावा यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागांसाठी सात मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. रोड शो दरम्यान विजयाची नोंद करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की जनता मला निवडून देईल असा मला विश्वास आहे. लोकांनी मनसुख वसावा यांना 25 वर्षे दिली पण बेरोजगारी, खराब आरोग्य तसेच शिक्षणाच्या पायाभूत सुविधा या प्रदेशातील प्रमुख समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४