शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:39 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 

"सीएम नितीश ४ जूननंतर कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात. नितीशकुमार आपला पक्ष वाचवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतात, असं वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बिहारमध्ये सत्ताबदलाच्या अफवाही वाढल्या आहेत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकदा सांगितले आहे की ते भाजप सोडून कुठेही जात नाहीत.

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पाटण्यात माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना विचारले की नितीश कुमार सोबत येणार का? त्यावर त्यांनी ४ जूनपर्यंत थांबा, असे उत्तर दिले. 

दुसरीकडे, इंडिया आघाडीचे शिल्पकार असलेले नितीश कुमार भाजपासोबत गेल्यानंतरही तेजस्वी यादव यांनी त्यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. तेजस्वी यांदव अनेकदा बोलताना सांगतात की, त्यांचे काका नितीश कुमार हे पालकासारखे आहेत. याआधीही त्यांचा आदर केला आणि भविष्यातही करत राहतील. 

मोदींची मोठी भविष्यवाणी

मोदी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हत्या होत आहेत. हल्ले होत आहेत. मतदानापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. एवढे अत्याचार होऊनही लोक अधिकाधिक मतदान करत आहेत. टीएमसी बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे तीन लोक होते आणि बंगालच्या लोकांनी आम्हाला 80 वर नेले. गेल्या वेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळेल."

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत येथे भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी डाव्यांचा पार सुपडा-साफ झाला होता. गेल्या निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशत भाजपला मोठा फायदा झाला होता. येथे भाजपने एकूण 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय, भाजपचा मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या, बसपाला 10, सपाला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitish Kumarनितीश कुमार