शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

४०० राहू द्या, फक्त २०० जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींनी दिले भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:18 IST

Mamata Banerjee challenged BJP: अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा जागा जिंकण्याचे आव्हान दिले.

तिरुवअनंतपुरम : अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला किमान २०० लोकसभा जागा जिंकण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

येथून पक्षाच्या उमेदवार असलेल्या महुआ मोईत्रा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, ‘भाजप ४०० पार’ म्हणत आहे, मी त्यांना आधी २०० जागा ओलांडण्याचे आव्हान देते. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी २०० पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु त्यांना ७७ वर थांबावे लागले. या ७७ आमदारांपैकी काहीजण तेव्हापासून आमच्यात सामील झाले आहेत.

‘सीएए हा सापळा’‘सीएए हा कायदेशीर नागरिकांना परदेशी बनवण्याचा सापळा आहे. एकदा तुम्ही सीएए लागू केल्यानंतर, एनआरसी होईल. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए किंवा एनआरसीला परवानगी देणार नाही. केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. तुम्ही अर्ज केल्यास, तुम्हाला ५ वर्षांसाठी परदेशी म्हणून घोषित केले जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा