शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 20:29 IST

Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सलग तिसऱ्यांदा बाजी मारून केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह देशातील बहुतांश भाजपाविरोधा पक्षांनी एकत्र येत विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. 

दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्वेमधून देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. या सर्वेमधील आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला ४३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला ४१ टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात १६ टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३८ टक्के, काँग्रेसला २० टक्के आणि इतर पक्षांना ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. 

मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला ३०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांपर्यंत मजल मारता येण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४४ जागा जातील.  पक्षनिहाय जागांचा विचार केल्यास यावेळी भाजपाला तीनशेच्या आतच जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला २८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ७४ आणि इतर पक्षांच्या खात्यात तब्बल १८२ जागा जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मत मांडताना सर्वेमध्ये सहभागी झालेल्या ५४ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. तर ४१ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाला नसल्याचं म्हटलं आहे. याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयोग होत नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी