शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 20:29 IST

Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सलग तिसऱ्यांदा बाजी मारून केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह देशातील बहुतांश भाजपाविरोधा पक्षांनी एकत्र येत विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. 

दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्वेमधून देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. या सर्वेमधील आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला ४३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला ४१ टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात १६ टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३८ टक्के, काँग्रेसला २० टक्के आणि इतर पक्षांना ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. 

मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला ३०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांपर्यंत मजल मारता येण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४४ जागा जातील.  पक्षनिहाय जागांचा विचार केल्यास यावेळी भाजपाला तीनशेच्या आतच जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला २८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ७४ आणि इतर पक्षांच्या खात्यात तब्बल १८२ जागा जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मत मांडताना सर्वेमध्ये सहभागी झालेल्या ५४ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. तर ४१ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाला नसल्याचं म्हटलं आहे. याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयोग होत नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी