शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:10 IST

Lok Sabha Election 2024: मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं.

मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं. प्रचारसभेत भाषण करत असताना उकाडा सहन न झाल्याने राहुल गांधी यांनी भरसभेत पाण्याची बाटली डोक्यावर ओतून उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे प्रचारसभेसाठी आले असताना ही घटना घडली. तिथे भाषण देत असताना खूप गरमी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी पाण्याची संपूर्ण बाटली डोक्यावर रिकामी केली. 

सध्या देशातील काही राज्यांत भीषण उन्हाळा सुरू आहे. तर  सर्व नेते हे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. मात्र भीषण उन्हाळ्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा ८ डिग्री अधिक तापमानाची नोंद होत आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते उकाड्यापासून वाचण्याचा सल्ला लोकांना देत आहेत.  

दरम्यान, उकाड्याने हैराण झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परमात्मा विधानावरून घणाघाती टीका केली.  त्यांनी सांगितले की, इतर सर्व जण बायोलॉजिकल आहेत. मात्र नरेंद मोदी हे बायोलॉजिकल नाही आहेत. त्यांना त्यांच्या परमात्माने अंबानी आणि अदानी यांची मदत करण्यासाठी पाठवलं आहे. मात्र परमात्माने त्यांना शेतकरी आणि मजुरांची मदत करण्यासाठी पाठवलेलं नाही.  

राहुल गांधी म्हणाले की, जर परमात्म्याने असं केलं असतं तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांची मदत केली असती. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले की, हे नरेंद्र मोदीवाले परमात्मा आहेत. काही चमचे मोदींसोबत बसून त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही आंबा कसा खाता, धुवून खाता की सोलून खाता, असले प्रश्न विचारतात. त्यावर मोदी मी काही करत नाही, सारं आपोआप होतं, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

जर मोदींना परमात्म्याने मोदींना पाठवले असते तर परमात्म्याने त्यांना देशातील सर्वात गरीब लोकांची मदत करा, असे सांगितले असते, शेतकऱ्यांची मदत करा, असे सांगितले असते. मात्र मोदींच्या परमात्म्याने त्यांना अंबानींची मदत करा, अदानींची मदत करा, असे सांगितले. अंबानी-अदानीचे १६ लाख कोटी माफ करा, असे सांगितले. हे कसले परमात्मा आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसweatherहवामानUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४