शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:10 IST

Lok Sabha Election 2024: मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं.

मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं. प्रचारसभेत भाषण करत असताना उकाडा सहन न झाल्याने राहुल गांधी यांनी भरसभेत पाण्याची बाटली डोक्यावर ओतून उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे प्रचारसभेसाठी आले असताना ही घटना घडली. तिथे भाषण देत असताना खूप गरमी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी पाण्याची संपूर्ण बाटली डोक्यावर रिकामी केली. 

सध्या देशातील काही राज्यांत भीषण उन्हाळा सुरू आहे. तर  सर्व नेते हे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. मात्र भीषण उन्हाळ्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा ८ डिग्री अधिक तापमानाची नोंद होत आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते उकाड्यापासून वाचण्याचा सल्ला लोकांना देत आहेत.  

दरम्यान, उकाड्याने हैराण झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परमात्मा विधानावरून घणाघाती टीका केली.  त्यांनी सांगितले की, इतर सर्व जण बायोलॉजिकल आहेत. मात्र नरेंद मोदी हे बायोलॉजिकल नाही आहेत. त्यांना त्यांच्या परमात्माने अंबानी आणि अदानी यांची मदत करण्यासाठी पाठवलं आहे. मात्र परमात्माने त्यांना शेतकरी आणि मजुरांची मदत करण्यासाठी पाठवलेलं नाही.  

राहुल गांधी म्हणाले की, जर परमात्म्याने असं केलं असतं तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांची मदत केली असती. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले की, हे नरेंद्र मोदीवाले परमात्मा आहेत. काही चमचे मोदींसोबत बसून त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही आंबा कसा खाता, धुवून खाता की सोलून खाता, असले प्रश्न विचारतात. त्यावर मोदी मी काही करत नाही, सारं आपोआप होतं, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

जर मोदींना परमात्म्याने मोदींना पाठवले असते तर परमात्म्याने त्यांना देशातील सर्वात गरीब लोकांची मदत करा, असे सांगितले असते, शेतकऱ्यांची मदत करा, असे सांगितले असते. मात्र मोदींच्या परमात्म्याने त्यांना अंबानींची मदत करा, अदानींची मदत करा, असे सांगितले. अंबानी-अदानीचे १६ लाख कोटी माफ करा, असे सांगितले. हे कसले परमात्मा आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसweatherहवामानUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४