शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आप-कांग्रेसच्या आघाडीमुळे दिल्लीतील समिकरणं बदलली, भाजपाची वाट अवघड? असं आहे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:22 IST

Lok Sabha Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची गाडी रुळावर येताना दिसत आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने इंडिया आघाडीचं बळ वाढलं आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटींनुसार दिल्लीमध्ये आप ४ आणि काँग्रेस ३ जागांवर लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता दिल्लीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने येथील  लोकसभेच्या ७ जागांचं गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपाने दिल्लीत ५६.९ टक्के मतं मिळवताना  सर्वच्या सर्व सातही जागांवर कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला २२.६ आणि आम आदमी पक्षाला १८.२ टक्के मतं मिळाली होती. याची एकत्रित बेरीज ही ४०.८ टक्के होते. ती भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा खूप कमी होती. दिल्लीतील ७ पैकी ५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस तर २ मतदारसंघामध्ये आप दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता २०२४ मध्येही मतदारांनी अशाच प्रकारे मतदान केल्यास काँग्रेस आणि आप एकत्र आले तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच आप आमि काँग्रेसला २०१९ प्रमाणे एकही जागा मिळणार नाही.

मात्र जर दिल्लीतील मतदारांनी २०१४ प्रमाणे मतदान केल्यास भाजपाची वाट अवघड होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सगळ्या जागा जिंकल्या असल्या तरी त्यावेळी भाजपाला ४६.६ टक्के मतं मिळाली होती. आप ३३.१ टक्के मतांसह दुसऱ्या आणि १५.२ टक्के मतांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही ४८.२ एवढी होती. आताही अशाच प्रकारे मतदान झाल्यास भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते. 

२०१४ मध्ये केवळ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची बेरीज ही आप आणि कांग्रेसच्या उमेदवारांनी मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. तर उर्वरित ६ मतदारसंघांत भाजपाच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा आप आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांची बेरीज अधिक होती.  

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस