शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आप-कांग्रेसच्या आघाडीमुळे दिल्लीतील समिकरणं बदलली, भाजपाची वाट अवघड? असं आहे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:22 IST

Lok Sabha Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची गाडी रुळावर येताना दिसत आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने इंडिया आघाडीचं बळ वाढलं आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटींनुसार दिल्लीमध्ये आप ४ आणि काँग्रेस ३ जागांवर लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता दिल्लीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने येथील  लोकसभेच्या ७ जागांचं गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपाने दिल्लीत ५६.९ टक्के मतं मिळवताना  सर्वच्या सर्व सातही जागांवर कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला २२.६ आणि आम आदमी पक्षाला १८.२ टक्के मतं मिळाली होती. याची एकत्रित बेरीज ही ४०.८ टक्के होते. ती भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा खूप कमी होती. दिल्लीतील ७ पैकी ५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस तर २ मतदारसंघामध्ये आप दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता २०२४ मध्येही मतदारांनी अशाच प्रकारे मतदान केल्यास काँग्रेस आणि आप एकत्र आले तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच आप आमि काँग्रेसला २०१९ प्रमाणे एकही जागा मिळणार नाही.

मात्र जर दिल्लीतील मतदारांनी २०१४ प्रमाणे मतदान केल्यास भाजपाची वाट अवघड होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सगळ्या जागा जिंकल्या असल्या तरी त्यावेळी भाजपाला ४६.६ टक्के मतं मिळाली होती. आप ३३.१ टक्के मतांसह दुसऱ्या आणि १५.२ टक्के मतांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही ४८.२ एवढी होती. आताही अशाच प्रकारे मतदान झाल्यास भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते. 

२०१४ मध्ये केवळ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची बेरीज ही आप आणि कांग्रेसच्या उमेदवारांनी मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. तर उर्वरित ६ मतदारसंघांत भाजपाच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा आप आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांची बेरीज अधिक होती.  

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस