शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 16:36 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघांतर्गत अलीराजपूर जिल्ह्यातील जोबत शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघांतर्गत अलीराजपूर जिल्ह्यातील जोबत शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सध्याच्या लोकसभा निवडणुकीत १५० जागाही मिळणार नाहीत आणि या निवडणुकांचा उद्देश संविधान वाचवणे हा आहे जे भाजपा आणि आरएसएस बदलू इच्छित आहेत, असंही गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस सरकार हे सुनिश्चित करेल की आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा लोकांच्या हितासाठी हटवली जाईल. जातीनिहाय जनगणनेतून लोकांच्या स्थितीबद्दल सर्व काही स्पष्ट होईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल. भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते संविधान बदलणार आहेत. यावेळी त्यांनी ४०० पार करा असा नारा दिला आहे. ४०० सोडा, त्यांना १५० जागाही मिळणार नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

"ही लोकसभा निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आहे, ज्याला भाजप आणि आरएसएस बदलू इच्छित आहेत, काँग्रेस आणि विरोधी पक्ष 'इंडिया' युती संविधानाचे रक्षण करत आहे. आदिवासी, दलित आणि ओबीसींना लाभ मिळतो हे संविधान आहे. "संविधानामुळेच आदिवासींना त्यांचे पाणी, जमीन आणि जंगलांवर अधिकार आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा