शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 03:50 IST

सूरत, खजुराहोनंतर आता या तिसऱ्या जागी भाजप उमेदवाराचा विजय निश्चितमानला जात आहे. 

संजय शर्मा

इंदूर (मध्य प्रदेश) : गेली ३५ वर्षांपासून इंदूर लोकसभेची जागा जिंकण्याची प्रतीक्षा करत असलेले काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का दिला. एवढेच नव्हे, तर लगेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला.

सूरत, खजुराहोनंतर आता या तिसऱ्या जागी भाजप उमेदवाराचा विजय निश्चितमानला जात आहे.  बम यांनी सोमवारी स्थानिक भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेथून मेंदोला यांच्यासोबत कारने निघून गेले. थोड्या वेळाने मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप कार्यालय गाठले व प्रवेशाची घोषणा केली. सूरत, खजुराहोनंतर इंदूरची जागा भाजपच्या झोळीत आली आहे.

विजयवर्गीय यांना कुणी दिला कानमंत्र?

इंदूरमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसणार आहे. आता भाजपची येथे अपक्ष उमेदवारांशी स्पर्धा आहे. काँग्रेस कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देते हे पाहणे बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्याप्रकारे भाजप नेत्यांना कानमंत्र दिला, त्यावरून विजयवर्गीय यांनी ही पटकथा तयार केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आता १४ उमेदवार उरले रिंगणात

काँग्रेसच्या उमेदवारासह ९ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यानंतर इंदूरमध्ये भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत.

यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लढतीत नाही. कधीकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा