शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:08 IST

Lok Sabha Election 2024: भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर (ShaShi Tharoor) यांनी केला आहे. 

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर यांनी केला आहे. 

बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशी थरूर म्हणाले की, आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. ४ जून रोजी दिल्लीमध्ये बदल दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये ३९ जागा जिंकल्यावरही कोरोना काळात कुठलीही मदत मिळाली नाही. आता देशात बदल घडवण्यासाठी महाआघाडीला विजयी करा, असं आवाहन शशी थरूर यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, आता कशा भारतात राहायचं हे तुम्ही ठरवा. पाटणा येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी बनवण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ चांगली भाषणं देतात. पण कुठल्या समस्येचं निराकरण करत नाहीत. मागच्या पाच टप्प्यातील मतदानातून बिहारमध्येही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही शशी थरूर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे स्टार प्रचारक बिहारमध्ये प्रचारासाठी आले नाहीत, तसेच येथील प्रचाराची सगळी धुरा तेजस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. याबाबत विचारले असता शशी थरूर म्हणाले की, आम्ही भाऊ आहोत. एक भाऊ एकीकडे प्रचार करत आहे, तर दुसरा दुसरीकडे प्रचार करत आहे. अशाप्रकारे दोघेही एकत्र येऊन प्रचार करत आहेत, असं स्पष्टीकरण शशी थरूर यांनी दिलं.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashi Tharoorशशी थरूरCentral Governmentकेंद्र सरकारbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस