शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 20:08 IST

Lok Sabha Election 2024: भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर (ShaShi Tharoor) यांनी केला आहे. 

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर यांनी केला आहे. 

बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशी थरूर म्हणाले की, आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. ४ जून रोजी दिल्लीमध्ये बदल दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये ३९ जागा जिंकल्यावरही कोरोना काळात कुठलीही मदत मिळाली नाही. आता देशात बदल घडवण्यासाठी महाआघाडीला विजयी करा, असं आवाहन शशी थरूर यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, आता कशा भारतात राहायचं हे तुम्ही ठरवा. पाटणा येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी बनवण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ चांगली भाषणं देतात. पण कुठल्या समस्येचं निराकरण करत नाहीत. मागच्या पाच टप्प्यातील मतदानातून बिहारमध्येही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही शशी थरूर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे स्टार प्रचारक बिहारमध्ये प्रचारासाठी आले नाहीत, तसेच येथील प्रचाराची सगळी धुरा तेजस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. याबाबत विचारले असता शशी थरूर म्हणाले की, आम्ही भाऊ आहोत. एक भाऊ एकीकडे प्रचार करत आहे, तर दुसरा दुसरीकडे प्रचार करत आहे. अशाप्रकारे दोघेही एकत्र येऊन प्रचार करत आहेत, असं स्पष्टीकरण शशी थरूर यांनी दिलं.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shashi Tharoorशशी थरूरCentral Governmentकेंद्र सरकारbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस