शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 10:45 IST

Lok Sabha Elections 2024 And Giriraj Singh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "यावेळी काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचा अजेंडा मुस्लिमांना प्रस्थापित करण्याचा आहे. त्यांना देशात इस्लामिक स्टेट बनवायचा आहे. जोपर्यंत भारतात सनातनचे बहुमत आहे तोपर्यंत लोकशाही आहे" असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधान पुढे करत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह म्हणाले की, पंडित नेहरू यांनी भारतातील हिंदूंना धोका दिला. जेव्हा 400 पार जागा जातील तेव्हा भारताचा विकास, भारताचा वारसा, काशी-मथुरा विकसित होईल. दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना सरमा म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपा जेव्हा 400 चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेतील कृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचं भव्य मंदिर बांधले जाईल. 

"राहुल-सोनिया देश सोडून पळून जाणार"

"राहुल गांधी आणि सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार आहेत... त्यांना देशाबद्दल प्रेम नाही. यावेळी त्यांना मागच्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील आणि ते भारतातून पळून जातील. काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील" असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांचा चेहरा भ्रष्ट असल्याचं म्हटलं आहे.

"जनतेने मोदींना भरभरून प्रेम दिलं"

"जेव्हापासून राहुल गांधी आणि तुकडे तुकडे गँग आली तेव्हापासून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गरीबाचा मुलगा पंतप्रधान कसा झाला हे त्यांना अजून पचनी पडत नाही. जेवढ्या वेळा ते मोदींना शिवीगाळ करत आहेत, तिकक्या वेळा मोदी त्यातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडत आहेत. जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. फारुख अब्दुल्ला यांना पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं" असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी