शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:09 IST

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही

पाटण (गुजरात) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे. मात्र लोकांना हे सर्व माहिती आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर मागासवर्गीय, आदिवासी, खुल्या गटातील गरीब आणि ओबीसींचा सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्याने देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गांधी यांनी सोमवारी दिली.

कॉंग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचारसभेत गांधी बोलत होते. “देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा समावेश आहे, परंतु कॉर्पोरेट, प्रसार माध्यमे, खासगी रुग्णालये, खासगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशहांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व तुम्हाला आढळणार नाही. केंद्रातील कामकाजाच्या प्रमुखपदी असलेल्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीनच मागासवर्गीय आहेत आणि त्यांनाही नगण्य पदे देण्यात आली आहेत.

भाजपने विषमता आणली

भाजपने १० वर्षांच्या राजवटीत देशात संपत्तीची विषमता आणली. देशातील केवळ २२ जणांकडे लोकसंख्येच्या ७० टक्के इतकी संपत्ती आहे, असा आरोपही त्यांनी केला. तत्पूर्वी राहुल यांची छत्तीसगडमधील बिलासपूर येथेह प्रचार सभा झाली. त्यातही त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

अग्निवीर योजना बंद करणार

भाजपला शेतकरी, गरिब, मागासवर्गीयांच्या फायद्याच्या योजना बंद करायच्या आहेत. खासगीकरण आणि अग्निपथ-अग्निवीर लष्करी भरती योजना ही आरक्षण संपवण्याची या सरकारची दोन साधने आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४