शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:09 IST

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही

पाटण (गुजरात) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे. मात्र लोकांना हे सर्व माहिती आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर मागासवर्गीय, आदिवासी, खुल्या गटातील गरीब आणि ओबीसींचा सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्याने देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गांधी यांनी सोमवारी दिली.

कॉंग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचारसभेत गांधी बोलत होते. “देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा समावेश आहे, परंतु कॉर्पोरेट, प्रसार माध्यमे, खासगी रुग्णालये, खासगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशहांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व तुम्हाला आढळणार नाही. केंद्रातील कामकाजाच्या प्रमुखपदी असलेल्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीनच मागासवर्गीय आहेत आणि त्यांनाही नगण्य पदे देण्यात आली आहेत.

भाजपने विषमता आणली

भाजपने १० वर्षांच्या राजवटीत देशात संपत्तीची विषमता आणली. देशातील केवळ २२ जणांकडे लोकसंख्येच्या ७० टक्के इतकी संपत्ती आहे, असा आरोपही त्यांनी केला. तत्पूर्वी राहुल यांची छत्तीसगडमधील बिलासपूर येथेह प्रचार सभा झाली. त्यातही त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

अग्निवीर योजना बंद करणार

भाजपला शेतकरी, गरिब, मागासवर्गीयांच्या फायद्याच्या योजना बंद करायच्या आहेत. खासगीकरण आणि अग्निपथ-अग्निवीर लष्करी भरती योजना ही आरक्षण संपवण्याची या सरकारची दोन साधने आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४