शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:09 IST

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही

पाटण (गुजरात) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्ता आल्यास राज्यघटना बदलण्याची आणि ते संपविण्याची योजना आखली आहे. मात्र लोकांना हे सर्व माहिती आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली तर मागासवर्गीय, आदिवासी, खुल्या गटातील गरीब आणि ओबीसींचा सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्याने देशव्यापी जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाहीदेखील गांधी यांनी सोमवारी दिली.

कॉंग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचारसभेत गांधी बोलत होते. “देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा समावेश आहे, परंतु कॉर्पोरेट, प्रसार माध्यमे, खासगी रुग्णालये, खासगी विद्यापीठे किंवा सरकारी नोकरशहांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व तुम्हाला आढळणार नाही. केंद्रातील कामकाजाच्या प्रमुखपदी असलेल्या ९० आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीनच मागासवर्गीय आहेत आणि त्यांनाही नगण्य पदे देण्यात आली आहेत.

भाजपने विषमता आणली

भाजपने १० वर्षांच्या राजवटीत देशात संपत्तीची विषमता आणली. देशातील केवळ २२ जणांकडे लोकसंख्येच्या ७० टक्के इतकी संपत्ती आहे, असा आरोपही त्यांनी केला. तत्पूर्वी राहुल यांची छत्तीसगडमधील बिलासपूर येथेह प्रचार सभा झाली. त्यातही त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

अग्निवीर योजना बंद करणार

भाजपला शेतकरी, गरिब, मागासवर्गीयांच्या फायद्याच्या योजना बंद करायच्या आहेत. खासगीकरण आणि अग्निपथ-अग्निवीर लष्करी भरती योजना ही आरक्षण संपवण्याची या सरकारची दोन साधने आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे गांधी यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४