शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:37 IST

Lok Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीवेळी मला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. मात्र जवळपास ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण या जामिनाची मुदत आता संपूत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात राहिल्यास आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देण्याच्या मुद्द्यावर सांगितलं की, मला कधीही पद किंवा खुर्चीचा मोह नव्हता. जेव्हा मी इन्कम टॅक्स विभागात कमिश्नर होतो. तेव्हा एका दिवसात नोकरीचा राजीनामा देऊन आलो होतो. त्यानंतर झोपडपट्ट्यांमधून काम काम केलं. त्यावेळी पक्ष स्थापन करायचा, निवडणूक लढवायची, अशी कुठलीही योजना नव्हती. पुणे अण्णांचं आंदोलन झालं. त्यानंतर पक्ष स्थापन केला, निवडणूक लढवून मुख्यमंत्री झालो,  मुख्यमंत्री झाल्यानंतर ४९ दिवसांनी स्वत:च्या मूल्यांसाठी मी राजीनामा दिला. तेव्हा माझ्याकडे कुणी राजीनामा मागितला नव्हता. तर मी स्वत: खुर्चीला लाथ मारली होती,असं अरविंद केजरीवाल म्हणाले.   

मात्र आज मी खुर्ची सोडत नाही आहे. कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हे नरेंद्र मोदींना ठावूक आहे. आम्ही एकदा ६७ तर दुसऱ्यांदा ६२ जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी आता नवा कट रचला. केजरीवाल यांना बनावट केसमध्ये अडचवायचं आणि अटक करायची.0 मत ते राजीनामा देतील आणि सरकार कोसळेल.  मी जर आज राजीनामा दिला, तर हा प्रयोग आणखी काही राज्यांमध्ये केला जाईल. मग पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा असेल. मग पिनराई विजयन यांचा नंबर लागेल. मग स्टॅलिन रांगेत असतील. त्यामुळे जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत तुरुंगातून सरकार चालवायचं, असं मॉडेल मी उभं केलं तर पुढे कुठल्याही मुख्यमंत्र्याला हात लावायची यांची हिंमत होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने असा कुठला कायदा नाही, त्यामुळे आम्ही त्यांना हटवू शकत नाही, असे सांगितले.   आता मीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसेच मी तुरुंगात आहे. मुख्यमंत्री असल्याने मला माझी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अधिकार देण्यात यावेत. तसेच तुरुंगात सुविधा देण्यात याव्यात, ज्यामुळे मी जामीन मिळेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेन, अशी मागणी करणार आहे.

दरम्यान, पुढील दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, जर यांनी मला दिल्लीच्या निवडणुकीवेळी तुरुंगात ठेवलं. तर कुठलाही प्रचार न करता आम आदमी पक्षाच्या ७० पैकी ७० जागा निवडून येतील. तसेच भाजपाला एकही जागा मिळणार नाही. जनता सगळं पाहत आहे. तसेच ती खूप समजूतदार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्ली