शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान यांना मोदींचा एवढा पुळका का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:49 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबई - गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर भारतातील राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादाची एक लाट आली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करत आहेत. तसेच सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या नावाने मोदी मतं देखील मागत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार योग्य असल्याचे इमरान खान यांनी म्हटले. तसेच काँग्रेस आल्यास उभय देशांमधील शांततेसाठीची चर्चा थांबेल असंही खान यांनी नमूद केले. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी दबक्या स्वरात, पाकिस्तानला इंदिरा गांधी तर आठवल्या नसतील ना, अशीही चर्चा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानला त्याच्या कुरापतीसाठी धडा शिकवताना पाकचे दोन तुकडे केले होते. त्यातून बांग्लादेशची निर्मिती झाली. हा इतिहास लक्षात आल्यामुळेच इमरान खान घाबरल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.

१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय जगाला ठावूक आहेत. त्यामुळे १९७१ नंतर जगाच्या नकाशावर बांग्लादेशचा उदय झाला. पाकिस्तानची सेना आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत होती. त्यावेळी इंदिरा यांच्यावर परदेशी माध्यमांकडून टीका झाली होती. परंतु, इंदिरा यांनी माध्यमांसमोर भारताची भूमिका कणखरपणे मांडली होती, हा इतिहास आहे.

काही दिवसांपूर्वीच 'बीबीसी'वर एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्यानुसार पाकिस्तानमधील काही भागात १९७१ प्रमाणेच स्थिती आहे. तसेच येथे बंड होण्याची शक्यता आहे. भारतात काँग्रेसचे सरकार आल्यास येथील बंडाला पुन्हा हवा मिळू शकते, यामुळे पाकिस्तान सरकारला भारतात मोदी सरकार हवं, असं त्यात म्हटलं होते.

या सर्व घडामोडींवरून इमरान खान यांचे आजचे ट्विट अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. काही दिवसांपूर्वीच इमरान खान यांनी मोदी सरकारसोबत शांततेची चर्चा होऊ शकत नाही, असं म्हटले होते. आता इमरान खान यांना अशी काय उपरती सुचली की, त्यांना मोदींचा एवढा पुळका आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसImran Khanइम्रान खान