शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान यांना मोदींचा एवढा पुळका का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:49 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबई - गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर भारतातील राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादाची एक लाट आली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करत आहेत. तसेच सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या नावाने मोदी मतं देखील मागत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार योग्य असल्याचे इमरान खान यांनी म्हटले. तसेच काँग्रेस आल्यास उभय देशांमधील शांततेसाठीची चर्चा थांबेल असंही खान यांनी नमूद केले. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी दबक्या स्वरात, पाकिस्तानला इंदिरा गांधी तर आठवल्या नसतील ना, अशीही चर्चा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानला त्याच्या कुरापतीसाठी धडा शिकवताना पाकचे दोन तुकडे केले होते. त्यातून बांग्लादेशची निर्मिती झाली. हा इतिहास लक्षात आल्यामुळेच इमरान खान घाबरल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.

१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि इंदिरा गांधी यांचे धाडसी निर्णय जगाला ठावूक आहेत. त्यामुळे १९७१ नंतर जगाच्या नकाशावर बांग्लादेशचा उदय झाला. पाकिस्तानची सेना आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत होती. त्यावेळी इंदिरा यांच्यावर परदेशी माध्यमांकडून टीका झाली होती. परंतु, इंदिरा यांनी माध्यमांसमोर भारताची भूमिका कणखरपणे मांडली होती, हा इतिहास आहे.

काही दिवसांपूर्वीच 'बीबीसी'वर एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्यानुसार पाकिस्तानमधील काही भागात १९७१ प्रमाणेच स्थिती आहे. तसेच येथे बंड होण्याची शक्यता आहे. भारतात काँग्रेसचे सरकार आल्यास येथील बंडाला पुन्हा हवा मिळू शकते, यामुळे पाकिस्तान सरकारला भारतात मोदी सरकार हवं, असं त्यात म्हटलं होते.

या सर्व घडामोडींवरून इमरान खान यांचे आजचे ट्विट अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. काही दिवसांपूर्वीच इमरान खान यांनी मोदी सरकारसोबत शांततेची चर्चा होऊ शकत नाही, असं म्हटले होते. आता इमरान खान यांना अशी काय उपरती सुचली की, त्यांना मोदींचा एवढा पुळका आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसImran Khanइम्रान खान