शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:57 IST

ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजप व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. त्यातच आता, मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या निकटवर्तीयसह टीएमसीचे ३ आमदार व अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बंगालमधील मिळालेल्या यशामुळे भाजप आता ममता बनर्जी यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत हिंसाचारऱ्यांच्या घटनांमुळे पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. त्यात, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने भाजप आणि टीएमसी यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. बंगालमध्ये चांगले यश मिळाल्याचे लक्षात येताच, भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. आज सकाळीच मुकुल रॉय आणि आणखी 2 आमदार दिल्लीकडे रवाना झाले असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

तिकडे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कमलनाथ यांनी आरोप केला आहे की, कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी पैसे आणि मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले जात आहे. तर, बीएसपीच्या आमदारांना कॉंग्रेसचा पाठींबा काढण्यासाठी 50-60 कोटीची ऑफर दिली जात असल्याचे ही आरोप होते आहे. त्यामुळे भाजपने लोकसभा बरोबर देशातील विधानसभा ही मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिका