शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ममतांना धक्का ! निकटवर्तीयसह टीएमसीचे 3 आमदार भाजपमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:57 IST

ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजप व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. त्यातच आता, मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या निकटवर्तीयसह टीएमसीचे ३ आमदार व अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बंगालमधील मिळालेल्या यशामुळे भाजप आता ममता बनर्जी यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत हिंसाचारऱ्यांच्या घटनांमुळे पश्चिम बंगाल चर्चेत आले होते. त्यात, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने भाजप आणि टीएमसी यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. बंगालमध्ये चांगले यश मिळाल्याचे लक्षात येताच, भाजपने आता पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात टीएमसीचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. आज सकाळीच मुकुल रॉय आणि आणखी 2 आमदार दिल्लीकडे रवाना झाले असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

तिकडे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कमलनाथ यांनी आरोप केला आहे की, कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी पैसे आणि मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले जात आहे. तर, बीएसपीच्या आमदारांना कॉंग्रेसचा पाठींबा काढण्यासाठी 50-60 कोटीची ऑफर दिली जात असल्याचे ही आरोप होते आहे. त्यामुळे भाजपने लोकसभा बरोबर देशातील विधानसभा ही मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिका