शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'वंदे मातरम'च्या मुद्दावर सतत आक्रमक असणाऱ्या भाजपचा 'यूटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:00 IST

पंतप्रधान मोदी वंदे मातरमच्या घोषणा देत असताना नितीश कुमार जागेवरून उठले नव्हते, यावर भाजप गप्प का, असं सुशील कुमार मोदी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, हा काही मुद्दा नाही.

नवी दिल्ली - 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांविरुद्ध राण पेटविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमच्या मुद्दावरून यूटर्न घेतला आहे. तसेच वंदे मातरम म्हणण्यासाठी किंवा वंदे मातरम सुरू असताना उभे राहावे, यासाठी कोणताही आग्रह नसल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी स्पष्ट केले. जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांच्यासोबत भाजपची बिहारमध्ये युती आहे. नितीश कुमारांसाठीच भाजपने वंद मातरमच्या नाऱ्याला आता बगल दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून भाजपच सर्वकाही सत्तेसाठीच का, अशी भावना व्यक्त होत आहे.

सुशील कुमार म्हणाले की, भाजप आणि जदयू नैसर्गिक साथीदार आहेत. मात्र दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी असल्याचे मोदींच्या लक्षात आणून दिले. त्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्यासाठी कोणत्याही विचारधारेची गरज नसते, असंही ते म्हणाले. यावेळी वंदे मातरमच्या मुद्दावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान मोदी वंदे मातरमच्या घोषणा देत असताना नितीश कुमार जागेवरून उठले नव्हते, यावर भाजप गप्प का, असं सुशील कुमार मोदी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, हा काही मुद्दा नाही. अनेकदा वंदे मातरम सुरू असताना मी देखील उभा राहात नाही. वंदे मातरमसाठी कुणावरही बंधन नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. मात्र अनेक सभांमध्ये भाजपकडून वंदे मातरमच्या मुद्दावर राजकारण करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यावेळी मोदींनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. तेव्हा सर्व नेते उभे राहिले होते. मात्र जदयूचे नेते नितीश कुमार आपल्या जागेवर बसून होते. एकप्रकारे नितीश यांनी वंद मातरमच्या घोषणेपासून स्वत:ला वेगळे केले होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. भारतीय जनता पक्ष सध्या राष्ट्रवादाच्या मुद्दावर निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातच वंदे मातरमचा मुद्दा भाजपकडून रेटण्यात आला होता.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा