शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात सपा-बसपाला चार-पाच जागा मिळतील; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:07 IST

राज्यातील अनेक ठिकाणी विजयाचे समीकरण लक्षात घेऊन तिकीट वाटप कऱण्यात आले आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीमुळे भाजपवर फारसा परिणाम होणार नाही.

नवी दिल्ली - देशातील चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असल्याचा दावा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष डॉ. महेंद्रनाथ पांड्येय यांनी केला आहे. त्यांच्यानुसार देशात २०१४ पेक्षा मोठी लाट आहे. यावेळी त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचे समर्थन केले आहे. तसेच त्या नेत्यांच्या संबंध कुठे ना कुठे भाजपशी होता, असा दावा देखील केला.

राज्यातील अनेक ठिकाणी विजयाचे समीकरण लक्षात घेऊन तिकीट वाटप कऱण्यात आले आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीमुळे भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. सपा-बसपा युती केवळ चार-पाच जागांवर सिमीत राहिल असा अंदाज पांड्येय यांनी व्यक्त केला. तर काँग्रेस देखील काही विशेष करिष्मा करू शकणार नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानापासूनच भाजपच्या बाजुने सर्व्हे येत आहेत. त्यामुळे २०१४ पेक्षा मोठी मोदीलाट यावर्षी असल्याचे पांड्येय यांनी सांगितले. तसेच सपा आणि बसपा ज्या जातींच्या जोरावर राजकारण करत आहेत, त्या जाती त्यांच्यासोबत नसून मोदींच्या पाठिशी आहे. त्यामुळे सपा-बसपा युती केवळ चार-पाच जागा मिळविण्यात यशस्वी होईल, असा दावा देखील पांड्ये यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेस ७५ जागा लढवत आहे. याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेस केवळ आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राहुल गांधींवर दोन जागांवरून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. भाजप अमेठी आणि रायबरेलीतून विजयी होण्याची शक्यता पांड्ये यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी