शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:45 IST

राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळी देण्यात आलेला 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' चर्चेत आला आहे.

राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार राजस्थानातील जनतेने वसुंधरा सरकार पाडले. परंतु, त्या नाऱ्याचा इफेक्ट आतापर्यंत कायम होता, हे लोकसभा निवडणुकीतून समोर आले आहे.

मध्य प्रदेशातील जनतेची नाराजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध नव्हती तर वसुंधरा राजेंविरुद्ध होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील जनतेने राज्यात जरी काँग्रेसला निवडून दिले असले तरी लोकसभेला नरेंद्र मोदी यांचीच निवड केली आहे. यावेळी येथील जनता मोदींच्या समर्थनात समोर आली. त्यातच पाकिस्तानवर केलेली एअर स्ट्राईक देखील मोदींसाठी जमेची बाजू ठरली आहे. मात्र एका नाऱ्याचा इफेक्ट चार-पाच महिने राहू शकतो, हे मोदींच्या राजस्थानातील विजयामुळे अधोरेखीत झाले, असंच म्हणावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदी