शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

गरज भासल्यास काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार : अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:29 IST

लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्वच्या सर्व सातही टप्पे पार पडले आहे. त्यानंतर लगेचच विविध संस्थांचे पूर्वानुमान अर्थात एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. तर विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवकाँग्रेसला पाठिंबा देण्यासंदर्भात अनुकुलता दर्शविली आहे. काँग्रेसला गरज भासल्यास आपण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गरिबांना, शेतकऱ्यांना, देशाला आणि देशात एकता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले देशातील पक्ष २३ मे नंतर देशाला नवीन पंतप्रधान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू सर्वांच्या भेटी घेत आहेत. गरज भासल्यास आपण काँग्रेसला देखील पाठिंबा देऊ, असं सांगताना उत्तर प्रदेशात महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा अखिलेश यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. दिल्लीत जावून मायावती काँग्रेस नेत्यांशी चर्चा करतील. मायावती यांचा दिल्ली दौरा आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दुसरीकडे चंद्रबाबू नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, युपीए प्रमुख सोनिया गांधी, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी देखील चर्चा केली. एकेकाळी एनडीएचे घटक असलेले नायडू मोदींविरोधात रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसBJPभाजपाmayawatiमायावती