शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:30 IST

नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान अद्याप राहिले असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबली नसल्याचे चित्र आहे. भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. यावेळी प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्षाने छोटासा राजकीय फायदा न पाहता राजधर्म पाळावा असं आवाहन सत्यार्थी यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी सत्ता आणि राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी म्हटले आहे.

प्रज्ञा ठाकूर हिने महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले होते. या वक्तव्यानंतर प्रज्ञा ठाकूरवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने ट्विटरवरून माफी मागितली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. महात्मा गांधी आणि गोडसे संदर्भात केलेले वक्तव्य घृणास्पद असल्याचे मोदींनी म्हटले होते. मात्र सत्यार्थी यांची मागणी मान्य करून मोदी राजधर्म पाळणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी