शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम मोदी Vs प्रियंका गांधी; वाराणसीत कुणाचे पारडे जड ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:45 IST

राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यास आपण तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास सूचना केल्यास आपण तयार असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले. केरळमधील वायनाड येथे राहुल यांचा प्रचार करण्यासाठी प्रियंका गांधी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाराणसीमध्ये लढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.

राहुल गांधी यांनी आपल्याला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यास आपण तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवतात. प्रियंका यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविल्यास भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लढत ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तर प्रियंका यांनी वाराणसीमधून निवडणूक लढविल्यास त्याचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. त्यामुळे वाराणसी मतदार संघातील स्थिती समजून घेणे तितकेच आवश्यक आहे.

  • २०१४ मध्ये मोदींनी आपले प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांना ३ लाख ७७ हजार मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी मोदींना ५ लाख ८१ हजार २२ मते मिळाली होती. तर केजरीवाल यांनी २ लाख ९ हजार २३८ मते मिळवली होती.
  • याच निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते. त्यांना ७५ हजार मते मिळाली होती. त्यापाठोपाठ बीएसपीला ६० हजार, सपाला ४५ हजार मते मिळाली होती. यामध्ये आप, सपा, बसपा आणि काँग्रेसचे मते जोडल्यास एकून ३ लाख ९० हजार ७२२ मतं होतात.
  • या सर्व पक्षांची एकूण मते मोदींच्या विजयाच्या फरकापेक्षा अधिक होतात. सपा आणि बसपाने अमेठी आणि रायबरेली मतदार संघात काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिला नाही. तोच पॅटर्न प्रियंका यांनी वाराणसीतून निवडणूक लढविल्यास सपा-बसपा राबवणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
  • वाराणसीमध्ये बनिया समाजाची लोकसंख्या ३.२५ आहे. हा समाज भाजपचा प्रमुख मतदार समजला जातो. परंतु, नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दावर नाराज असलेल्या बनिया समाजाचे मते वळविण्यास काँग्रेसला यश आल्यास वाराणसीमध्ये मोदींसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • वाराणसीमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अडीच लाख आहे. विश्वनाथ कॉरिडोर बनविण्यासाठी ब्राह्मण समजाचे घरं मोठ्या प्रमाणात जाणार आहे. तसेच एसटी/एसटी कायद्यामुळे ब्राह्मण समाज सरकारवर नाराज आहे. या मतदारांवर उभय पक्षांची नजर असणार आहे.
  • यादवांची संख्या या मतदार संघात दीड लाखांच्या जवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यादव समाज भाजपचा मतदार आहे. मात्र सपाच्या पाठिंब्यानंतर ही मते काँग्रेसकडे वळू शकतात. त्यामुळे भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे.
  • वाराणसीत तीन लाखांच्या जवळ मुस्लीम समाज आहे. भाजपला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच मुस्लीम समाज मतदान करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
  • भूमीहार सव्वा लाख, राजपूत एक लाख, पटेल दोन लाख, चौरसिया ८० हजार, दलित ८० हजार आणि इतर मागासवर्गीयांची ७० हजार मते वळविण्यास प्रियंका यांना जमले तर निकाल अनपेक्षीत लागू शकतो.
  • आकडेवारीवरून असंच दिसत की जातीची समीकरणे जुळल्यास प्रियंका गांधी वाराणसीतून मोदींना चांगलीच टक्कर देऊ शकतात.
  •  मागील साडेचार वर्षांत मोदींनी वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने विकास केला, त्यावरून मतदार त्यांना डावलतील, याची शक्यता फारच कमी आहे.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा