शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

लोकसभा निवडणुकीत 'नोटाला' मोठ्याप्रमाणात पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 14:11 IST

२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी हाती आला असून, एनडीएला ३५३ तर यूपीएला ९१ ठिकाणी विजय मिळवता आला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नोटाला ही मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतून हि माहिती समोर आली आहे. एकट्या राजस्थानमध्ये ३ लाख २७ हजार ५५९ लोकांनी नोटाला पसंती दिली आहे. हा आकडा राजस्थानमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी १.१% टक्के ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने देशात होणाऱ्या निवडणुकीत मतदारांना नोटा हा पर्याय, २०१३ पासून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला असून, मतदार संघातील उमेदवारांना नाकारले आहे. बिहारमधील ४० जागांवर झालेल्या निवडणुकीत ८ लाख १७ हजार मतदारांनी नोटा हा पर्याय वापरला आहे. बिहारमध्ये झालेल्या एकूण मतांच्या २% लोकांनी नोटाचा बटणाला पसंती दिली आहे.

पंजाबमध्ये १३ जागांपैकी ८ ठिकणी कॉंग्रेसला विजय मिळवता आला आहे. तर, याच पंजाबमध्ये १ लाख ५४ हजार ४२३ मतदारांनी कोणत्याच राजकीय पक्षाला मतदान न करता, नोटाचा बटन दाबणे पसंत केले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सुद्धा ४५००० पेक्षा जास्त लोकांनी नोटाचा वापर केला आहे.

२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता. देशात झालेल्या एकूण मतदानाच्या १.१% टक्के लोकांनी त्यावेळी नोटाला पसंती दिली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल