शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा नवा 'NARA', देशाला सांगितली 'मोदी सरकार -२'ची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 20:52 IST

समृद्ध भारत हे नवं जनआंदोलन उभं करायचं आहे आणि विकसनशील देश हे लेबल हटवायचं आहे. - नरेंद्र मोदी

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली.राष्ट्रविकास हे आपलं ध्येय आहेच, पण त्यासोबत प्रादेशिक अस्मिता जपणं, जोपासणं हेही गरजेचं आहे.२०१४ मध्ये 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या मोदींनी यावेळी 'समृद्ध भारता'चा इरादा बोलून दाखवला आहे. 

पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून पुन्हा विक्रमी बहुमत मिळवून पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारचा नवा 'नारा' जाहीर केला.  National Ambition, Regional Aspiration - अर्थात राष्ट्रीय आकांक्षा आणि प्रादेशिक अस्मिता यांचा मेळ घालून समृद्ध भारत हे नवं जनआंदोलन उभं करायचं आहे आणि विकसनशील देश हे लेबल हटवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.    

संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. पंतप्रधानपदासाठी तब्बल ३५३ खासदारांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर केलेल्या विस्तृत भाषणात, मोदींनी ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त केला, जनतेचे आभार मानले, नव्या खासदारांना मार्गदर्शन केले, जुन्या खासदारांचे कान टोचले आणि आपल्या सरकारची दिशा काय असेल, हेही सांगितले. २०१४ मध्ये 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या मोदींनी यावेळी 'समृद्ध भारता'चा इरादा बोलून दाखवला आहे. 

>> देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं अपरिहार्य आहे. एनडीए हे एक विश्वस्त आंदोलन आहे. हा प्रयोग आणखी सशक्त करायचा आहे. एकट्या भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले असतानाही मी हे बोलतोय, कारण ते आवश्यक आहे.

>> राष्ट्रविकास हे आपलं ध्येय आहेच, पण त्यासोबत प्रादेशिक अस्मिता जपणं, जोपासणं हेही गरजेचं आहे.

>> एनर्जी आणि सिनर्जी या रसायनाच्या जोरावरच एनडीए सामर्थ्यशाली झाली आहे.  

>> अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान आहे. 

>> सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, हे ब्रीद घेऊन काम करायचं आहे.  

>> घरातील उपासना पद्धती कुठलीही असो, बाहेर पडल्यानंतर भारत देश हीच आपली माता आहे.

>> जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही. 

>> सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते. 

>> समृद्ध भारत हे नवे जनआंदोलन असेल. 'विकसनशील देश' हे लेबल हटवायचं आहे.

>> अनेक प्रस्थापितांना पराभूत करून आल्याचा गर्व बाळगू नका. तुम्ही मोदींमुळे निवडून आलेला नाहीत, तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे. जनतेच्या मतांचा सन्मान करा. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी