शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सत्तांतर झाल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री रघुराम राजन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:27 IST

'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. रघुराम राजन यांनी आपण भारतात परतण्यासाठी तयार असून योग्य संधीची वाट पाहात असल्याचे आधीच म्हटले आहे. आता 'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

रघुराम राजन यांच्या सल्ल्यानंतर काँग्रसेने सत्तेत आल्यास देशातील गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजन यांच्या अर्थनितीचा काँग्रेस फायदा घेणार असल्याचे समजते. तसेच सत्ता आल्यास देखील काँग्रेस राजन यांना सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतं.

१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यानंतर काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे तब्बल दहा वर्षे देशाचे नेतृत्व सोपविले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. राजन हे अर्थतज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे त्यांना युपीएकडून अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडणार आहे.

सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या 'बूथ स्कूल ऑफ बिजनेस'मध्ये व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधील विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaghuram Rajanरघुराम राजनcongressकाँग्रेस