शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

सत्तांतर झाल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री रघुराम राजन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:27 IST

'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. रघुराम राजन यांनी आपण भारतात परतण्यासाठी तयार असून योग्य संधीची वाट पाहात असल्याचे आधीच म्हटले आहे. आता 'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

रघुराम राजन यांच्या सल्ल्यानंतर काँग्रसेने सत्तेत आल्यास देशातील गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजन यांच्या अर्थनितीचा काँग्रेस फायदा घेणार असल्याचे समजते. तसेच सत्ता आल्यास देखील काँग्रेस राजन यांना सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतं.

१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यानंतर काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे तब्बल दहा वर्षे देशाचे नेतृत्व सोपविले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. राजन हे अर्थतज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे त्यांना युपीएकडून अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडणार आहे.

सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या 'बूथ स्कूल ऑफ बिजनेस'मध्ये व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधील विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaghuram Rajanरघुराम राजनcongressकाँग्रेस