शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शिवसेनेशी युती?... नाय, नो, नेव्हर!; काँग्रेसने केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 19:27 IST

Lok Sabha Election 2019: शिवसेनेपासून चार हात लांबच राहण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे.

नवी दिल्लीः आपला 'प्रिय मित्र' - भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेपासून चार हात लांबच राहण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. शिवसेनेची आणि आमची विचारधाराच वेगळी आहे, त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांना 'टाळी' देण्याचा, सोबत घेण्याचा काही संबंधच नाही, असं पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी आज एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. 

केंद्रातील मोदी सरकारला २०१९च्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकीचं बळ वापरण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यापासूनच ही मोर्चेबांधणी सुरू झालीय आणि आता या हालचालींना वेग आलाय. नेतेमंडळींच्या भेटीगाठी वाढू लागल्यात. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावेळीही या ऐक्याचं दर्शन घडलं होतं. 

या पार्श्वभूमीवर, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने काँग्रेस 'मिशन २०१९'साठी इतर विरोधकांप्रमाणेच शिवसेनेलाही सोबत घेणार का, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. भाजपासोबतच सत्तेत असतानाही नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर सेना सातत्याने बाण सोडत असते. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावेळीही त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या गळाभेटीचं शिवसेनेनं कौतुक केलं होतं. त्यानंतर, काही दिवसांतच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, त्या शुभेच्छांचा आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा काहीही संबंध नसल्याचं काँग्रेसनं नमूद केलंय. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी