शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्ज फेडू न शकल्यास फौजदारी गुन्हा नसेल; काँग्रेसचं ऐतिहासिक आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 13:14 IST

'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

ठळक मुद्देशेतकरी कर्ज फेडू न शकल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं.'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्यासारखे कोट्यधीश उद्योगपती बँकेचा पैसा घेऊन पळून जातात. पण, प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं. परंतु, काँग्रेस सत्तेत आल्यास हा नियम रद्द केला जाईल, शेतकरी कर्ज फेडू न शकल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल, असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं. 

'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या. आपले पंतप्रधान रोजच खोटं बोलत आहेत. आम्ही मात्र सत्य बोलतोय. जी शक्य होतील अशीच खरी आश्वासनं आम्ही देत आहोत, असं नमूद करत राहुल यांनी 'न्याय', रोजगार, किसान, शिक्षण आणि आरोग्य अशी पंचसूत्री मांडली. 

देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात दरवर्षी ७२ हजार रुपये जमा करण्याची घोषणा राहुल गांधींनी आधीच केली आहे. या 'न्याय' योजनेचा पुनरुच्चार करत, 'गरिबी पर वार, बहत्तर हजार', असा नारा त्यांनी आज दिला. नोटाबंदी, जीएसटीमुळे ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था या ७२ हजार रुपयांमुळे उसळी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबमध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. ते आमच्या सरकारने पूर्ण केलं आहे. केंद्रात सत्तेत आल्यास शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट मांडलं जाईल, असं राहुल यांनी सांगितलं. बँकेचं कर्ज फेडू न शकणारा शेतकरी तुरुंगात जाऊ नये, यादृष्टीने नियम बदलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणासाठी खर्च केली जाईल आणि आरोग्यव्यवस्था बळकट करण्यावरही भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चौकीदार चोर आहे, हे सगळ्यांना कळून चुकलंय. त्यामुळेच जनता पुन्हा काँग्रेसकडे सत्ता सोपवेल, असंही ते ठामपणे म्हणाले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीcongressकाँग्रेस