शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Lok Sabha Election 2019 : दिल्लीत आप-काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 13:16 IST

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युतीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेआपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतील सातपैकी सहा मतदार संघातील उमेदावारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत. काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर दिल्लीतील लोकसभेचे घमासान आणखीच रंगतदार होणार आहे. काँग्रेसच्या यादीत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यावेळी चांदणी चौक मतदार संघातून जे.पी. अग्रवाल, नॉर्थ-ईस्ट दिल्लीतून शीला दीक्षित, ईस्ट दिल्लीतून अरिंदर सिंह लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, नॉर्थ वेस्ट दिल्लीतून राजेश लिलोथिया आणि वेस्ट दिल्लीतून महाबल मिश्रा मैदानात आहेत. तर साऊथ दिल्लीतील उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्यामुळे आप आणि काँग्रेस यांच्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसला दिल्लीत ४-३ फॉर्म्युला हवा होता. तर आप ५-२ वर ठाम होते. तसेच दिल्लीसह इतर राज्यात देखील आप आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसने उमेदवार घोषित केल्यामुळे युती होणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे.

 

शीला दीक्षित-मनोज तिवारी लढत रंगणार

नॉर्थ ईस्ट दिल्लीत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्यात लढत होणार आहे. भाजपकडून नॉर्थ ईस्ट दिल्लीतून मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आम आदमी पक्षाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. तर चांदणी चौकमध्ये भाजपकडून डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे जे.पी. अग्रवाल यांचे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा