शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:37 IST

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यासाठी इच्छूक होते. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसडमधील विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवात काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 'सप-बसप'सोबत युती करण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच कालावधीत काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर युतीची चर्चा बारगळली, असं अखिलेश यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदार संघात सपा-बसपाने उमेदवार दिले नाही, याचा अर्थ असा नाही की, आपण काँग्रेससाठी सॉफ्ट आहोत. मायावती आणि आपण मिळून हा निर्णय घेतला होता. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. परंतु, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नसल्याचे अखिलेश यांनी नमूद केले. तसेच दोन्ही पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची स्थिती खराब झाल्याचे टीका देखील यावेळी त्यांनी केली.

दरम्यान उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून विजयी होतील अशाच लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. जे उमेदवार निवडून येणार नाहीत, ते उमेदवार भाजपच्या मतांचे विभाजन करण्यासाठी असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हटले होते. त्यावर अखिलेश म्हणाले की, प्रियंका खुद्द गोंधळलेल्या आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी