शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:37 IST

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यासाठी इच्छूक होते. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसडमधील विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवात काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 'सप-बसप'सोबत युती करण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच कालावधीत काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर युतीची चर्चा बारगळली, असं अखिलेश यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदार संघात सपा-बसपाने उमेदवार दिले नाही, याचा अर्थ असा नाही की, आपण काँग्रेससाठी सॉफ्ट आहोत. मायावती आणि आपण मिळून हा निर्णय घेतला होता. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. परंतु, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नसल्याचे अखिलेश यांनी नमूद केले. तसेच दोन्ही पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची स्थिती खराब झाल्याचे टीका देखील यावेळी त्यांनी केली.

दरम्यान उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून विजयी होतील अशाच लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. जे उमेदवार निवडून येणार नाहीत, ते उमेदवार भाजपच्या मतांचे विभाजन करण्यासाठी असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हटले होते. त्यावर अखिलेश म्हणाले की, प्रियंका खुद्द गोंधळलेल्या आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी