शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:37 IST

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यासाठी इच्छूक होते. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसडमधील विधानसभा निवडणुकीतील विजयोत्सवात काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 'सप-बसप'सोबत युती करण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच कालावधीत काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर युतीची चर्चा बारगळली, असं अखिलेश यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदार संघात सपा-बसपाने उमेदवार दिले नाही, याचा अर्थ असा नाही की, आपण काँग्रेससाठी सॉफ्ट आहोत. मायावती आणि आपण मिळून हा निर्णय घेतला होता. दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. परंतु, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नसल्याचे अखिलेश यांनी नमूद केले. तसेच दोन्ही पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाची स्थिती खराब झाल्याचे टीका देखील यावेळी त्यांनी केली.

दरम्यान उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून विजयी होतील अशाच लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. जे उमेदवार निवडून येणार नाहीत, ते उमेदवार भाजपच्या मतांचे विभाजन करण्यासाठी असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हटले होते. त्यावर अखिलेश म्हणाले की, प्रियंका खुद्द गोंधळलेल्या आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी