शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:03 IST

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जाहीर केली. यामध्ये अधिक बदल न करता अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणुकीच्या रिंगाणात उतरविले आहे. 

स्मृती इराणी यांना अमेठीतून दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मतदार संघातून राहुल गांधी यांनी २००९ मध्ये ३ लाख ७० हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु २०१४ मध्ये राहुल यांची लीड १ लाख ७ हजार हजारांवर आली होती. यावरून स्मृती इराणी यांनी राहुल यांना तगडे आव्हान दिल्याचे स्पष्ट होेते. यावेळी देखील केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष यांच्यातील लढत चुरशीची होण्याचा अंदाज आहे.

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. मागील पाच वर्षांत केंद्राय मंत्री असताना त्यांनी अनेकदा अमेठीचा दौरा केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीच्या विकासाचे लक्ष नसल्याचे आरोप केले होते. आता परिस्थिती बदलली असली तर स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये वाढवलेला जनसंपर्क आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेले कामे यामुळे त्या काँग्रेस अध्यक्षांना तगडे आव्हान देतील हे स्पष्टच आहे.

दरम्यान २०१४ मध्ये मोदी लाट होती, परंतु आता तशी स्थिती नाही. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहे. तसेच तीन राज्यात पक्षाला मिळवून दिलेल्या विजयामुळे राहुल यांची प्रतिमा उंचावली आहे. या दोन्ही बाबीकडे पाहिल्यास अमेठी येथील काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यातील ही लढत चांगलीच चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघ गांधी कुटुंबियांचा गड मानला जातो. १९७७-८० आणि १९९८-१९९९ वगळता इतर वेळी येथे काँग्रेस विजय झाले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी १९८१-१९९१ या कालावधीत येथील खासदार होते. तर राहुल यांनी २००४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. यापूर्वी सोनिया गांधी येथून पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या आता रायबरेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसBJPभाजपा