शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:03 IST

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जाहीर केली. यामध्ये अधिक बदल न करता अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणुकीच्या रिंगाणात उतरविले आहे. 

स्मृती इराणी यांना अमेठीतून दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मतदार संघातून राहुल गांधी यांनी २००९ मध्ये ३ लाख ७० हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु २०१४ मध्ये राहुल यांची लीड १ लाख ७ हजार हजारांवर आली होती. यावरून स्मृती इराणी यांनी राहुल यांना तगडे आव्हान दिल्याचे स्पष्ट होेते. यावेळी देखील केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष यांच्यातील लढत चुरशीची होण्याचा अंदाज आहे.

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. मागील पाच वर्षांत केंद्राय मंत्री असताना त्यांनी अनेकदा अमेठीचा दौरा केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीच्या विकासाचे लक्ष नसल्याचे आरोप केले होते. आता परिस्थिती बदलली असली तर स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये वाढवलेला जनसंपर्क आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेले कामे यामुळे त्या काँग्रेस अध्यक्षांना तगडे आव्हान देतील हे स्पष्टच आहे.

दरम्यान २०१४ मध्ये मोदी लाट होती, परंतु आता तशी स्थिती नाही. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहे. तसेच तीन राज्यात पक्षाला मिळवून दिलेल्या विजयामुळे राहुल यांची प्रतिमा उंचावली आहे. या दोन्ही बाबीकडे पाहिल्यास अमेठी येथील काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यातील ही लढत चांगलीच चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघ गांधी कुटुंबियांचा गड मानला जातो. १९७७-८० आणि १९९८-१९९९ वगळता इतर वेळी येथे काँग्रेस विजय झाले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी १९८१-१९९१ या कालावधीत येथील खासदार होते. तर राहुल यांनी २००४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. यापूर्वी सोनिया गांधी येथून पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या आता रायबरेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसBJPभाजपा