शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:03 IST

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जाहीर केली. यामध्ये अधिक बदल न करता अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणुकीच्या रिंगाणात उतरविले आहे. 

स्मृती इराणी यांना अमेठीतून दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मतदार संघातून राहुल गांधी यांनी २००९ मध्ये ३ लाख ७० हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु २०१४ मध्ये राहुल यांची लीड १ लाख ७ हजार हजारांवर आली होती. यावरून स्मृती इराणी यांनी राहुल यांना तगडे आव्हान दिल्याचे स्पष्ट होेते. यावेळी देखील केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष यांच्यातील लढत चुरशीची होण्याचा अंदाज आहे.

स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. मागील पाच वर्षांत केंद्राय मंत्री असताना त्यांनी अनेकदा अमेठीचा दौरा केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीच्या विकासाचे लक्ष नसल्याचे आरोप केले होते. आता परिस्थिती बदलली असली तर स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये वाढवलेला जनसंपर्क आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेले कामे यामुळे त्या काँग्रेस अध्यक्षांना तगडे आव्हान देतील हे स्पष्टच आहे.

दरम्यान २०१४ मध्ये मोदी लाट होती, परंतु आता तशी स्थिती नाही. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहे. तसेच तीन राज्यात पक्षाला मिळवून दिलेल्या विजयामुळे राहुल यांची प्रतिमा उंचावली आहे. या दोन्ही बाबीकडे पाहिल्यास अमेठी येथील काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यातील ही लढत चांगलीच चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघ गांधी कुटुंबियांचा गड मानला जातो. १९७७-८० आणि १९९८-१९९९ वगळता इतर वेळी येथे काँग्रेस विजय झाले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी १९८१-१९९१ या कालावधीत येथील खासदार होते. तर राहुल यांनी २००४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. यापूर्वी सोनिया गांधी येथून पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या आता रायबरेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसBJPभाजपा