शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:18 IST

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वाधिक खासदारांच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर असलेलं राज्य बिहारमध्ये भाजपाला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे. बहुतांश एक्झिट पोलमधून देशात एनडीए पुन्हा बहुमत मिळवेल असं चित्र दिसतंय. मात्र भाजपाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू, भाजपा, एलजेपी यांना 40 पैकी 30 जागा मिळतील असा अंदाज टाईम्स नाऊ-वीएमआर यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दाखवत आहे. तर काँग्रेस, राजद आणि अन्य पक्ष यांना 10 जागा मिळतील असं दाखविण्यात येत आहे. 

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला मागील लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान होताना दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51.5 टक्के तर यूपीएला 32.8 टक्के आणि इतरांना 15.7 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 48.52 टक्के, यूपीएला 42.78 टक्के आणि इतरांना 8.7 टक्के मते मिळतील असं सांगितलं जात आहे. यूपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे तर एनडीएच्या मतदान टक्केवारीत 2.98 टक्के घट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला 5 जागांचा फटका बसेल असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष निकाल 23 मे रोजी लागतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव