शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:18 IST

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वाधिक खासदारांच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर असलेलं राज्य बिहारमध्ये भाजपाला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे. बहुतांश एक्झिट पोलमधून देशात एनडीए पुन्हा बहुमत मिळवेल असं चित्र दिसतंय. मात्र भाजपाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू, भाजपा, एलजेपी यांना 40 पैकी 30 जागा मिळतील असा अंदाज टाईम्स नाऊ-वीएमआर यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दाखवत आहे. तर काँग्रेस, राजद आणि अन्य पक्ष यांना 10 जागा मिळतील असं दाखविण्यात येत आहे. 

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला मागील लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान होताना दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51.5 टक्के तर यूपीएला 32.8 टक्के आणि इतरांना 15.7 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 48.52 टक्के, यूपीएला 42.78 टक्के आणि इतरांना 8.7 टक्के मते मिळतील असं सांगितलं जात आहे. यूपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे तर एनडीएच्या मतदान टक्केवारीत 2.98 टक्के घट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला 5 जागांचा फटका बसेल असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष निकाल 23 मे रोजी लागतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव