शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:18 IST

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वाधिक खासदारांच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर असलेलं राज्य बिहारमध्ये भाजपाला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे. बहुतांश एक्झिट पोलमधून देशात एनडीए पुन्हा बहुमत मिळवेल असं चित्र दिसतंय. मात्र भाजपाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू, भाजपा, एलजेपी यांना 40 पैकी 30 जागा मिळतील असा अंदाज टाईम्स नाऊ-वीएमआर यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दाखवत आहे. तर काँग्रेस, राजद आणि अन्य पक्ष यांना 10 जागा मिळतील असं दाखविण्यात येत आहे. 

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला मागील लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान होताना दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51.5 टक्के तर यूपीएला 32.8 टक्के आणि इतरांना 15.7 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 48.52 टक्के, यूपीएला 42.78 टक्के आणि इतरांना 8.7 टक्के मते मिळतील असं सांगितलं जात आहे. यूपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे तर एनडीएच्या मतदान टक्केवारीत 2.98 टक्के घट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला 5 जागांचा फटका बसेल असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष निकाल 23 मे रोजी लागतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. 

बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव