शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Lockdown: योगी सरकारचा यू-टर्न; कामगारांना परत बोलावण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 08:22 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी यू-टर्न घेत सरकारचे एक पाऊल मागे घेतले आहे.

ठळक मुद्देयूपीत परतलेले मजूर ही आमच्या सरकारची संपत्ती कामगारांना परत बोलवायचं असेल तर आमची परवानगी लागेल, यूपी सरकारच्या निर्णयावर टीका टीकेनंतर योगी सरकारने घेतला यू-टर्न, परवानगी घेण्याची गरज नाही केलं स्पष्ट

लखनऊ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक मजुरांचे कामधंदे ठप्प झाल्याने परराज्यातील मजूर आपापल्या राज्यात जात आहे. यात इतर राज्यातून गेलेले सर्वाधिक मजूर यूपीचे आहेत. मागील काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने श्रमिक मजुरांचे हक्क आणि रोजगारासाठी मायग्रेशन कमिशन बनवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी यूपीच्या कामगारांना परत कामावर घ्यायचं असेल तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल अशी घोषणा केली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी यू-टर्न घेत सरकारचे एक पाऊल मागे घेतले आहे. अशाप्रकारे परवानगी घेण्याची कोणतीही अट मायग्रेशन कमिशनमध्ये समाविष्ट करणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केले आहे. योगी सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशच्या कामगारांना त्यांच्याकडे नोकरी अथवा कामावर ठेवण्यासाठी यूपी सरकारच्या परवानगीची गरज नाही.

सरकारला आपल्या कामगारांची चिंता सामाजिक सुरक्षेसाठी आहे. यासाठी श्रमिक कल्याण आयोग गठीत करण्यात येत आहे. हा मायग्रेशन कमिशन असेल. या अंतर्गत राज्यात परतलेल्या कामगारांच्या कौशल्याचं मापन केले जाईल. जो ज्या क्षेत्रात कुशल असेल त्याला रोजगार देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील असेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत २५ लाख स्थलांतरित मजूर राज्यात परतले आहेत. सध्या या सर्वांची नोंदणी आणि डेटा तयार करण्याचं काम सुरु आहे.

उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या रविवारी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात असणारं जितकं मनुष्यबळ आहे ती आमची संपत्ती आहे. या सर्वांचे कौशल्य मापन करत एक कमिशन बनवून सरकार उत्तर प्रदेशात व्यापक स्तरावरील रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम करेल. आता कोणत्याही सरकारला मनुष्यबळाची गरज भासल्यास राज्य सरकार त्यांच्या सामाजिक सुरक्षेची हमी देईल, त्यांचा विमा उतरविला जाईल, त्यांना सर्व मार्गांनी संरक्षणही देण्यात येईल त्यासाठी यूपी सरकारची परवानगी लागेल.

राज ठाकरेंनी केली होती टीका

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं. तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा, असेही आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला केलं होतं.

...तर महाराष्ट्रात येताना आमची परवानगी घ्यावी लागेल, राज ठाकरेंचा आदित्यनाथांना कडक इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशRaj Thackerayराज ठाकरे