शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

Lockdown News: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 08:39 IST

Coronavirus: उत्तर प्रदेश सरकारने परतणाऱ्या कामगारांच्या सुविधेसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातून कामगार यूपीत परतले स्थलांतरित कामगारांसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याचा निर्णय कामगारांना राज्यात रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर

लखनऊ – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे काम ठप्प झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर आपापल्या राज्यात स्थलांतरित होत आहेत. यात देशातील इतर राज्यातून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या मजुरांची संख्या सर्वात जास्त आहे.

उत्तर प्रदेश सरकारने परतणाऱ्या कामगारांच्या सुविधेसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ज्या राज्यांना यूपीचे मजूर पुन्हा बोलवायचे असतील तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत ट्विट करुन म्हटलं आहे की, स्थलांतरित मजुरांना राज्यस्तरावर विमा देण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचसोबत अशाप्रकारे यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्यात या कामगारांच्या सुरक्षेसाठी यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरण करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणाले.

तसेच उत्तर प्रदेशात येणाऱ्या प्रत्येक कामगार आणि मजूरवर्गाला रोजगार दिला जाईल. या कामगारांसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्यात येईल. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक कामगाराला सुरक्षित राज्यात आणणं हे सरकारचं प्राधान्य आहे. कोरोना संकट काळात काही राज्यांनी यूपीच्या मजुरांची योग्यप्रकारे व्यवस्था केली नाही त्यामुळे या मजुरांना पुन्हा आपल्या राज्यात परतावं लागलं आहे असा आरोपही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात आलेले मजूर आणि कामगार हे उत्तर प्रदेशाची संपत्ती आहेत. त्यांच्या कुशलतेच्या आधारे नोंदणीकरण केले जाईल. या सर्वांना राज्यात रोजगार दिले जातील. मायग्रेशन कमिशनमुळे त्यांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही सर्व आमची माणसं आहेत. जर कोणत्याही राज्यांना या कामगारांना परत बोलवायचे असेल तर त्यांची सामाजिक, आर्थिक सुरक्षासह सर्व अधिकार निश्चित केले जातील. यासाठी यूपी सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे.

आतापर्यंत २३ लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. मुंबई आणि दिल्लीहून येणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. इतर राज्यातून आलेल्या ३० टक्के मजूर कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. महाराष्टातून येणारे ७५ टक्के कोरोना संक्रमित आहेत. आम्ही या सर्वांचे स्क्रिनिंग करुन त्यांना क्वारंटाईन करत आहोत. राज्यभरात ७५ हजारपेक्षा अधिक मेडिकल टीम यासाठी कार्य करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtraमहाराष्ट्रMigrationस्थलांतरण