शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

Lockdown News: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 08:39 IST

Coronavirus: उत्तर प्रदेश सरकारने परतणाऱ्या कामगारांच्या सुविधेसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातून कामगार यूपीत परतले स्थलांतरित कामगारांसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याचा निर्णय कामगारांना राज्यात रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर

लखनऊ – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे काम ठप्प झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर आपापल्या राज्यात स्थलांतरित होत आहेत. यात देशातील इतर राज्यातून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या मजुरांची संख्या सर्वात जास्त आहे.

उत्तर प्रदेश सरकारने परतणाऱ्या कामगारांच्या सुविधेसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ज्या राज्यांना यूपीचे मजूर पुन्हा बोलवायचे असतील तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत ट्विट करुन म्हटलं आहे की, स्थलांतरित मजुरांना राज्यस्तरावर विमा देण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचसोबत अशाप्रकारे यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्यात या कामगारांच्या सुरक्षेसाठी यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरण करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणाले.

तसेच उत्तर प्रदेशात येणाऱ्या प्रत्येक कामगार आणि मजूरवर्गाला रोजगार दिला जाईल. या कामगारांसाठी मायग्रेशन कमिशन स्थापन करण्यात येईल. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक कामगाराला सुरक्षित राज्यात आणणं हे सरकारचं प्राधान्य आहे. कोरोना संकट काळात काही राज्यांनी यूपीच्या मजुरांची योग्यप्रकारे व्यवस्था केली नाही त्यामुळे या मजुरांना पुन्हा आपल्या राज्यात परतावं लागलं आहे असा आरोपही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात आलेले मजूर आणि कामगार हे उत्तर प्रदेशाची संपत्ती आहेत. त्यांच्या कुशलतेच्या आधारे नोंदणीकरण केले जाईल. या सर्वांना राज्यात रोजगार दिले जातील. मायग्रेशन कमिशनमुळे त्यांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ही सर्व आमची माणसं आहेत. जर कोणत्याही राज्यांना या कामगारांना परत बोलवायचे असेल तर त्यांची सामाजिक, आर्थिक सुरक्षासह सर्व अधिकार निश्चित केले जातील. यासाठी यूपी सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे.

आतापर्यंत २३ लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. मुंबई आणि दिल्लीहून येणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. इतर राज्यातून आलेल्या ३० टक्के मजूर कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. महाराष्टातून येणारे ७५ टक्के कोरोना संक्रमित आहेत. आम्ही या सर्वांचे स्क्रिनिंग करुन त्यांना क्वारंटाईन करत आहोत. राज्यभरात ७५ हजारपेक्षा अधिक मेडिकल टीम यासाठी कार्य करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtraमहाराष्ट्रMigrationस्थलांतरण