शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

लॉकडाऊनचा निर्णय महाभयंकर; कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याचा तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:14 AM

सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग काही दिवसांपासून सुरू झाला आहे, असा दावा प्रतिबंधक औषधे व संसर्गजन्य आजार या विषयातील तज्ज्ञांनी केला आहे. मात्र सामूहिक संसर्गाची सुरुवात झालेली नाही, या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे.

यासंदर्भात या तज्ज्ञांनी एका पत्रकात म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाने जोर धरला आहे. संसर्गजन्य आजार कसे फैलावतात याचे उत्तम ज्ञान असलेले अनेक तज्ज्ञ देशात उपलब्ध असून, त्यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केली होती का? तसे झाले असते तर या साथीचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करता आला असता. त्याऐवजी साथींच्या फैलावाचे अतिशय मर्यादित ज्ञान असलेल्या लोकांबरोबर चर्चा करून देशात लॉकडाऊन जाहीर करण्याचा भयंकर निर्णय केंद्र सरकारने घेतला.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन आॅफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), इंडियन असोसिएशन आॅफएपिडेमिआॅलॉजिस्ट या तीन संस्थांनी हे संयुक्त पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, सनदी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम साºया देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे मानवी समस्या आणखी गुंतागुंतीच्या बनल्या. देशामधील कोरोना आजाराच्या फैलावाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र सरकारने शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर व जनतेला दिली पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारकडून पारदर्शक पद्धतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोरोनाच्या रुग्णांत कमी प्रमाणात लक्षणे दिसतात किंवा लक्षणेच आढळून येत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी घरातच थांबायला सांगून तिथे उपचार दिले पाहिजेत.स्थिती आणखी चिंताजनक बनू शकतेसंसर्गजन्य आजार व प्रतिबंधक औषधे या विषयातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना साथीचा प्रसार सुरू झाला त्या प्रारंभीच्या काळात स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली असती तर या साथीचा फैलाव खूपच कमी झाला असता. शहरांतून हे स्थलांतरित मजूर परतत असलेल्या ग्रामीण भागात आधीच पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. जर तिथे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावला तर परिस्थिती आणखी चिंताजनक बनू शकते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस